AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supreme Court : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर ३ ऑगस्टला सुनावणी, सुप्रीम कोर्टाकडून तारीख पे तारीख

सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत निवडूक आयोग कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. विशेष म्हणजे सध्या जे काही सरकार आहे त्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इतकाच विस्तार झाला आहे.

Supreme Court : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर ३ ऑगस्टला सुनावणी, सुप्रीम कोर्टाकडून तारीख पे तारीख
ईडब्ल्यूएस आरक्षणाचे काय होणार?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 31, 2022 | 1:32 PM
Share

मुंबई – शिवसेनेतील (Shivsena) आमदार आपली भूमिका वेगळी असल्याचे सांगून एक गट तयार केला आहे. तेव्हापासून महाराष्ट्रात (Maharashtra) मोठा सत्तासंघर्ष सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही गट पक्ष आमचा असल्याचे सांगत कोर्टात (Court) गेले आहेत. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष कोर्टाच्या निकालाकडे लागले आहे. कारण पूर्वी 1 ऑगस्टला त्यावर सुनावणी होणार होती. आत्ता 3 ऑगस्टला होणार असल्याचे कोर्टाकडून जाहीर केले आहे. 16 आमदारांच्या निलंबन प्रकरणी अद्याप सुनावणी बाकी असून त्याकडे महाराष्ट्रासह संपुर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. दोन्ही गटात मागच्या काही दिवसांपासून मोठा वाद सुरु आहे. त्याचबरोबर दोन्ही बाजूकडील मोठ्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

शिंदे गटाने थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली

जेव्हापासून दोन गट विभक्त झाले आहेत. तेव्हापासून महाराष्ट्रात एक वेगळं राजकारण पाहायला मिळत आहे. कारण आत्तापर्यंत दोन्ही गटाने पक्षाचं आणि पक्षाच्या झेंड्यावर निवडणूक आयोगाकडे दावा केला आहे. दोन्ही गटानी आपली बाजू मांडण्यासाठी निवडणूक आयोगाने वेळ आणि कागदपत्रे जमा करण्याचे आदेश दिले होते. आता नेमकं पक्षाचं आणि पक्षाचा झेंडा कुणाच्या पारड्यात जाणार याकडे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे. निवडणुक आयोगाच्या नोटीशीनंतर शिंदे गटाने थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवरती अपात्रतेची कारवाई केली होती.

सरकार स्थापनेतही अडथळे येण्याची शक्यता

सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत निवडूक आयोग कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. विशेष म्हणजे सध्या जे काही सरकार आहे त्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इतकाच विस्तार झाला आहे. तसेच सरकार स्थापनेतही अडथळे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष आहे. सुप्रीम कोर्टात सध्या तारिख वाढल्याने आता महाराष्ट्र तीन तारखेची वाट पाहत आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.