AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींना ‘नीच’ म्हटलेलं आता खरं ठरलं की नाही? : मणिशंकर अय्यर

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वापरलेल्या ‘नीच’ शब्दाची पुन्हा एकदा आठवण करुन दिली आहे. त्यांनी ‘द प्रिंट’ या न्यूज पोर्टलवर लिहिलेल्या लेखात मोदींसाठी वापरलेला ‘नीच’ शब्द खरा ठरल्याचे म्हणत त्याचे समर्थन केले. मणिशंकर अय्यर यांनी डिसेंबर 2017 मध्ये पंतप्रधान मोदींना नीच म्हटले होते. त्यानंतर त्यांनी याबद्दल माफीही मागितली होती. […]

मोदींना ‘नीच’ म्हटलेलं आता खरं ठरलं की नाही? : मणिशंकर अय्यर
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM
Share

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वापरलेल्या ‘नीच’ शब्दाची पुन्हा एकदा आठवण करुन दिली आहे. त्यांनी ‘द प्रिंट’ या न्यूज पोर्टलवर लिहिलेल्या लेखात मोदींसाठी वापरलेला ‘नीच’ शब्द खरा ठरल्याचे म्हणत त्याचे समर्थन केले. मणिशंकर अय्यर यांनी डिसेंबर 2017 मध्ये पंतप्रधान मोदींना नीच म्हटले होते. त्यानंतर त्यांनी याबद्दल माफीही मागितली होती. काँग्रेसनेही त्यांच्यावर 2 वर्षांची निलंबनाची कारवाई केली होती.

अय्यर यांनी लिहिलेल्या लेखात त्यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली. जवाहरलाल नेहरुंच्या शिक्षणाचा संदर्भ देत त्यांनी पंतप्रधान मोदींच्या शिक्षणावर आणि त्यांच्या अवैज्ञानिक मतांवरही हल्ला चढवला. ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी हवाई दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मूर्ख समजतात का, त्यांनी या अधिकाऱ्यांसमोर काहीही अवैज्ञानिक दावे करावेत? आणि त्या अधिकाऱ्यांनीही पंतप्रधानांना दुरुस्त करण्याचे धाडस दाखवू नये?”

पंतप्रधान मोदी केंद्रीय राखीव पोलीस दलासह (सीआरपीएफ) देशाच्या संरक्षण दलाचा आणि जवानांच्या बलिदानाचा वापर राजकारणासाठी करत आहेत. हे असे करणे म्हणजे देशविरोधी कृती असल्याचाही आरोप अय्यर यांनी केला.

काय म्हणाले होते मणिशंकर अय्यर?

पंतप्रधान मोदींनी आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये गांधी कुटुंबावर जोरदार टीका केली होती. त्यावर उत्तर देताना अय्यर यांनी मोदींचा उल्लेख ‘नीच’ असा केला होता.

डॉ. आंबेडकरांच्या स्मरणार्थ आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन होत असताना पंतप्रधान मोदींनी गांधी कुटुंबावर घाणेरडी टीका केली. मला वाटतं मोदी खूप नीच स्वरुपाचा माणूस आहे. त्यांच्यामध्ये कोणतीही सभ्यता नाही. अशा प्रसंगी एवढे घाणेरडे राजकारण करण्याची आवश्यकता नव्हती.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.