AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi : ‘प्याद्यालाही वजिराच्या ताकदीने खेळवता येतं!’ मोदी-शाहांच्या मास्टरस्ट्रोकची हीच ती रणनिती?

'प्याद्यालाही वजिराच्या ताकदीने खेळवता येतं!'- नरेंद्र मोदी

Narendra Modi : 'प्याद्यालाही वजिराच्या ताकदीने खेळवता येतं!' मोदी-शाहांच्या मास्टरस्ट्रोकची हीच ती रणनिती?
| Updated on: Jul 01, 2022 | 9:18 AM
Share

मुंबई : राज्याच्या सत्तांतराचं नाट्य सध्या एका अनपेक्षित वळणावर आलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्रिपद देण्यात आलं असल्याचं फडणवीसांनी जाहीर केलं. पण भाज या सरकारमध्ये प्रत्यक्ष सहभागी नसेल. तर भाजपचा बाहेरून पाठिंबा असेल, असं खुद्द देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) जाहीर केलं. त्यानंतर शपथविधी आधी नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने उपमुख्यमंत्रीपद स्विकारण्याचा आदेश दिला. आपल्या इच्छेला मुरड घालत फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण त्यांच्या या निर्णयावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांचा गेम केल्याची चर्चा आहे. त्यावरच भाष्य करणारा एक व्हीडिओ मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट केला आहे आणि त्याला बुद्धिबळ असं कॅप्शन दिलं आहे.

संदीप देशपांडे यांचं ट्विट

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक व्हीडिओ शेअर केला आहे. त्याला बुद्धिबळ असं कॅप्शन दिलं आहे. या नरेंद्र मोदी बुद्धिबळाचा खेळ समजावत आहेत.

“आपली स्वत:ची एक ताकद असते. युनिक क्षमता असते. तुम्ही जर एखाद्या मोहऱ्याला घेऊन एखादी चाल केली. त्याच्या ताकदीचा योग्य उपयोग केला तर तो सर्वात शक्तिशाली बनतो. एवढंच नव्हे तर एक प्यादा ज्याला सर्वात कमजोर समजलं जातं, तोही सर्वात ताकदवान मोहरा बनू शकतो. गरज आहे फक्त योग्यवेळी योग्य चाल खेळण्याची, योग्य पाऊल उचलण्याची मग तो मग तो प्यादा चेसबोर्डवरच्या हत्ती, उंट, वजीरची ताकदही मिळवू शकतो”, असं नरेंद्र मोदी यांनी या व्हीडिओमध्ये म्हटलंय.

मोदींचा दोनदा फोन

फडणवीस यांना शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं नव्हतं. आपण मुख्यमंत्री होतो. त्यामुळे पुन्हा खालच्या पदावर कशाला जायचं अशी त्यांची भूमिका होती. मात्र, पक्षाच्यावतीने त्यांच्यावर दबाव वाढत होता. शिंदे मंत्रिमंडळावर भाजपचा वचक राहिला पाहिजे. तसेच महत्त्वाचे निर्णय घेताना ते पटकन घेता आले पाहिजे, यासाठी पक्षश्रेष्ठींना फडणवीस मंत्रिमंडळात हवे होते. पण फडणवीस तयाला तयार नव्हते. त्यामुळे शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फडणवीसांना दोनदा फोन करावा लागला. त्यामुळे फडणवीस यांना नाही म्हणता आलं नाही आणि त्यांना शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.