AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asim Sarode : संविधानाच्या विषयावर असीम सरोदे यांचं मोठ वक्तव्य

Asim Sarode : "आपण नागरिक म्हणून राहुल नार्वेकर याना प्रश्न विचारला पाहिजे कि, संविधानची शपथ घेऊन सांगा, जर शेड्युल 6 नुसार हा विषय तुम्ही हाताळू शकत नाही, तर मग, त्यांनी एक पत्र सर्वोच्च न्यायालयाला द्यायचे होते"

Asim Sarode : संविधानाच्या विषयावर असीम सरोदे यांचं मोठ वक्तव्य
Asim Sarode
Follow us
| Updated on: Jun 27, 2024 | 11:23 AM

“पक्षांतर बंदी कायदा हा राजीव गांधींनी आणला. हा कायदा पक्षांतर होऊ नये म्हणून आणला आहे. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी पक्षांतर केले, मग देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की मीच ते घडवून आणले. एका मुलाखतीत सांगितले की गेलो आणि येईन येईन म्हणून दोन पक्ष फोडून आलो. राष्ट्रवादी पण फोडली. सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये असंवैधानिक काम, बेकायदेशीर रित्या राजकारण करून जर कोणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे” असा आरोप असीम सरोदे यांनी केला.

“महाराष्ट्र धर्म सांगतो की, आम्हाला अशी फोडाफोडी मान्य नाही. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या सगळ्यात जास्त कुरूप चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस आहे. भारतामध्ये नरेंद्र मोदींची लाट आहे, पण महाराष्ट्रामध्ये दोन लाटा होत्या, नरेंद्र मोदी विरोधी लाट आणि देवेंद्र फडणवीस विरोधी लाट” अशी टीका असीम सरोदे यांनी केली.

‘राहुल नार्वेकर याना प्रश्न विचारला पाहिजे’

“राहुल नार्वेकर यांनी सांगितले की, कोणीही अपात्र नाही. हा पक्षांतर बंदीचा वाद नाही, पक्षातंर्गत वाद आहे. आपण नागरिक म्हणून राहुल नार्वेकर याना प्रश्न विचारला पाहिजे कि, संविधानची शपथ घेऊन सांगा, जर शेड्युल 6 नुसार हा विषय तुम्ही हाताळू शकत नाही, तर मग, त्यांनी एक पत्र सर्वोच्च न्यायालयाला द्यायचे होते. हे विषय हाताळू शकत नाही” अशी टीका असीम सरोदे यांनी केली.

‘बेकायदेशीर सरकार आमच्या बोकांडीवर मारले’

“बेकायदेशीर सरकार आमच्या बोकांडीवर मारले, हा संविधानाशी द्रोह आहे. हे संविधानाचे गुन्हेगार आहेत. राहुल नार्वेकर, देवेंद्र फडणवीस, अमित शाह, नरेंद्र मोदी हे सगळे संविधानाचे दोषी आहेत. ते संविधान विरोधी काम करत आहेत. त्याना संविधानाच बदलायचे आहे असा माझा आरोप आहे” असं असीम सरोदे म्हणाले.

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.