AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आधी मराठा आता OBC समाजाची माती केली’, चित्रा वाघांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण झाल्याची टीका वाघ यांनी केलीय.

'आधी मराठा आता OBC समाजाची माती केली', चित्रा वाघांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
chitra wagh
sagar joshi
sagar joshi | Updated on: May 29, 2021 | 6:56 PM
Share

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवले आहे. यासंदर्भातील ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळून लावली आहे. त्यावरुन भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर आता भाजपच्या उपनेत्या चित्रा वाघ यांनीही सरकारवर टीका केलीय. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण झाल्याची टीका वाघ यांनी केली आहे. (Additional OBC reservation in local bodies canceled, BJP leader Chitra Wagh criticizes Thackeray government)

OBC आरक्षणावर देवेंद्र फडणवीस यांनी विस्तृत भाष्य केलेलं तेव्हा सरकार म्हणून आपण काय केलतं? आधी मराठा आता OBC समाजाची माती केलीत…वर तोंड करून म्हणतात आम्ही OBC साठी लढू. अरे तुमच्या नाकर्त्यापणामुळे गेलयं आरक्षण, लढायला आमचे आम्ही भक्कम, सरकार म्हणून तुम्ही काय करणार ते सांगा, असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारलाय. हे ट्वीट करताना त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटचा आधार घेतलाय.

‘निर्बुद्ध व्यक्तीच्या हातात कारभार दिल्याचे परिणाम’

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. ‘ठाकरे सरकारचा आणखी एक प्रताप. स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण रद्द! सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल. वारंवार सूचना करून देखील ठाकरे सरकारची सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्यात दिरंगाई. निर्बुद्ध व्यक्तीच्या हातात कारभार दिल्याचे हे परिणाम आहेत. होते ते देखील सांभाळता आलं नाही’, अशी टीका बावनकुळे यांनी केलीय.

नाकर्तेपणा सोडा आणि जागे व्हा: फडणवीस

दरम्यान, ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द झाल्याने त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही टीका केली आहे. तसेच याबाबत फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रंही लिहिलं आहे. राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर पुन्हा अन्याय झाला आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून, वारंवार स्मरणपत्रे पाठवून सुद्धा कोणतीही कारवाई राज्य सरकारने केली नाही. आतातरी नाकर्तेपणा सोडून जागे व्हा, असं फडणवीस यांनी या पत्रात म्हटलं आहे.

संबंधित बातम्या : 

त्यावेळी संभाजी छत्रपतींनी संसदेत तोंड का उघडले नाही?; कोळसे-पाटलांचा सवाल

मोठी बातमी: स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टानं ठाकरे सरकारची याचिका फेटाळली

Additional OBC reservation in local bodies canceled, BJP leader Chitra Wagh criticizes Thackeray government

Follow Us
मतं घेताना लाज वाटली नाही का? खोतांना आंदोलनकर्त्यांचा थेट सवाल
New Delhi CJP Protest | मतं घेताना लाज वाटली नाही का? सदाभाऊ खोतांना आंदोलनकर्त्यांचा थेट सवाल
सर्वत्र खळबळ! दिल्लीतील CJP च्या आंदोलनाबाबत राहुल गांधीचं विधान
त्या' एका विधानाने सर्वत्र खळबळ! दिल्लीतील CJP च्या आंदोलनाबाबत राहुल गांधी स्पष्टच म्हणाले
आंदोलक म्हणजे आतंकवादी! खोतांच्या वादग्रस्त वक्तव्याने राजकारण तापलं
Sadabhau Khot | आंदोलक म्हणजे आतंकवादी! सदाभाऊ खोतांच्या वादग्रस्त वक्तव्याने राजकारण तापलं
दिल्लीतील CJP च्या आंदोलनाबाबत CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीतील CJP च्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, आंदोलनांसारख्या संवेदनशील...
ठाकरे गटाचा मोठा डाव! सर्व फुटीर खासदारांना कोर्टात ओढणार, नेमकं काय..
ठाकरे गटाचा मोठा डाव! सर्व फुटीर खासदारांना कोर्टात ओढणार, नेमकं काय घडलं?
देशात लोकशाही उरली कि निव्वळ...अमित ठाकरे यांचा ट्विट करत सरकारला सवाल
Amit Thackeray | देशात लोकशाही उरली कि निव्वळ दडपशाही सुरु आहे? अमित ठाकरे यांचा ट्विट करत सरकारला संतप्त सवाल
अमेरिकेसोबतच्या 'त्या' करारामुळे प्रकरण पेटलं! हजारो शेतकरी रस्त्यावर,
अमेरिकेसोबतच्या 'त्या' करारामुळे प्रकरण पेटलं! हजारो शेतकरी रस्त्यावर, दिल्लीत मोठ्या हालचाली?
पैसा द्या, पेपर घ्या? धर्मेंद्र प्रधानांवर AI व्हिडीओ ट्विट करत....
पैसा द्या, पेपर घ्या? धर्मेंद्र प्रधानांवर AI व्हिडीओ ट्विट करत काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
12 वर्षांच्या मुलींचं डोकं फोडलं... दिल्ली पोलिसांवर दीपकेंचे आरोप
Abhijit Dipke | 12 वर्षांच्या मुलींचं डोकं फोडलं, कपडे फाडले... दिल्ली पोलिसांवर अभिजित दीपकेंचे गंभीर आरोप
जालियनवाला बागची आठवण करून देत राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
Sanjay Raut | 20 जुलै हा ब्लॅक डे! जालियनवाला बागची आठवण करून देत संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, राहुल गांधी यांची मागणी...

नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, राहुल गांधी यांची मागणी..

आंदोलकांच्या आडून काहींचा अराजकता माजवण्याचा हेतू; CJP आंदोलनावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया.

आंदोलकांच्या आडून काहींचा अराजकता माजवण्याचा हेतू; CJP आंदोलनावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Sadabhau Khot : आंदोलकांना आंतकवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांची मुलांनी लायकी, लाज काढली VIDEO.

Sadabhau Khot : आंदोलकांना आंतकवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांची मुलांनी लायकी, लाज काढली VIDEO

IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्ध मालिका जिंकण्यासाठी भारत सज्ज, सराव सत्रातील व्हिडिओमध्ये वैभव सूर्यवंशीचं वेगळेच रुप दिसले.

IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्ध मालिका जिंकण्यासाठी भारत सज्ज, सराव सत्रातील व्हिडिओमध्ये वैभव सूर्यवंशीचं वेगळेच रुप दिसले

Mallikarjun Kharge: हा लोकशाही संपवण्याचा प्रयत्न; मल्लिकार्जुन खर्गेंचा सरकारवर हल्लाबोल.

Mallikarjun Kharge: हा लोकशाही संपवण्याचा प्रयत्न; मल्लिकार्जुन खर्गेंचा सरकारवर हल्लाबोल

125 मिनिटांचा महाफ्लॉप चित्रपट; ओटीटीवर येताच 2 नंबरवर होतोय ट्रेंड.

125 मिनिटांचा महाफ्लॉप चित्रपट; ओटीटीवर येताच 2 नंबरवर होतोय ट्रेंड