AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकवेळ हिजड्यांना पोरं होतील, पण…. : नितीन गडकरी

सांगली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. ‘एक वेळ हिजड्यासोबत लग्न केलं तरी मूलं झाली असती, मात्र सांगली जिल्ह्यातील जलसिंचन योजना पूर्ण झाली नसती’, असे वक्तव्य गडकरींनी सांगलीत विकास कामांच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर गडकरींवर टीका केली जात आहे. सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या […]

एकवेळ हिजड्यांना पोरं होतील, पण.... : नितीन गडकरी
| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM
Share

सांगली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. ‘एक वेळ हिजड्यासोबत लग्न केलं तरी मूलं झाली असती, मात्र सांगली जिल्ह्यातील जलसिंचन योजना पूर्ण झाली नसती’, असे वक्तव्य गडकरींनी सांगलीत विकास कामांच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर गडकरींवर टीका केली जात आहे. सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या रस्ते महामार्ग आणि अन्य विकास कामांचा शुभारंभाच्या कार्यक्रमात गडकरींनी हे वक्तव्य केलं.

टेंभू सिंचन योजना पूर्ण होण्यास खूप अडथळे येत होते. ती पूर्ण होईल असे कोणी ठामपणे सांगू शकत नव्हते. पण भाजपाच्या काळात ही योजना पूर्ण झाली. हे सांगताना गडकरी उदाहरण देतांना म्हणाले,

‘एक वेळ हिजड्यासोबत लग्न केलं तरी मूलं झाली असती, मात्र सांगली जिल्ह्यातील जलसिंचन योजना पूर्ण झाली नसती. मात्र या योजना आम्ही पूर्ण केल्या. असं माझं मत आहे’, म्हणतं गडकरींनी आपल्या या वक्तव्यावर स्पष्टीकरणही दिले.

अतिरिक्त शुल्क साखरेचा विचार करून शेतकऱ्यांनी यापुढे उसाची लागवड करू नये, जर जास्त प्रमाणात साखर तयार झाली तर भविष्यात साखर समुद्रात बुडवावी लागेल, अशी भीती गडकरी यांनी व्यक्त केली. साखर ऐवजी इथेनॉल तयार करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.

सांगली जिल्ह्यातून जाणारे विविध महामार्ग आणि अन्य रस्ते या कामासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून जवळपास साडेपाच हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रस्त्यांच्या भूमिपूजनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सांगली जिल्ह्याच्या दौर्या वर होते.

परदेशात साखरेला 20 रुपये दर आहे, आपल्या कडे 40 रुपये दर आहे, तरीही ऊस दर प्रश्नी आपल्याकडे आंदोलने सुरू आहेत. असे सांगत गडकरी पुढे म्हणाले,

‘साखर कारखाना हा सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. मात्र कारखानदारांनी शेतकऱ्यांचे आणि ऊसतोडणी मजुरांचे शोषण करू नये आणि शेतकऱ्यांनीही कारखाने बंद पडतील अशी आंदोलने करू नये.’

मी जाहीर सांगतो, मी साखर कारखाना काढून चूक केली, मागील जन्मात जे पाप करतात, ते एक तर साखर कारखाना काढतात किंवा पेपर (दैनिक) काढतात. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात सिंचन योजनांची कामं म्हणजे पैसा नसताना केवळ दगड बसवून तयार केलेली स्मारकं होती, असेही यावेळी गडकरी म्हणाले.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.