AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात भाजपच्या 25 पैकी फक्त या 2 उमेदवारांचा पराभव

मुंबई : शिवसेना आणि भाजपने या वर्षीही राज्यात रेकॉर्डब्रेक विजय मिळवलाय. युतीने राज्यात 41 जागांवर विजय मिळवला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेने शिरुर आणि औरंगाबाद हा मतदारसंघ गमावलाय. पण कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये त्याची भरपाई झाली आहे. अनेक उमेदवारांनी लाखोंच्या फरकाने विजय मिळवला आहे. भाजपचे उत्तर मुंबईचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी यावेळीही सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा […]

राज्यात भाजपच्या 25 पैकी फक्त या 2 उमेदवारांचा पराभव
| Edited By: | Updated on: May 23, 2019 | 9:28 PM
Share

मुंबई : शिवसेना आणि भाजपने या वर्षीही राज्यात रेकॉर्डब्रेक विजय मिळवलाय. युतीने राज्यात 41 जागांवर विजय मिळवला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेने शिरुर आणि औरंगाबाद हा मतदारसंघ गमावलाय. पण कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये त्याची भरपाई झाली आहे. अनेक उमेदवारांनी लाखोंच्या फरकाने विजय मिळवला आहे. भाजपचे उत्तर मुंबईचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी यावेळीही सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम केलाय. त्यांनी यावेळी जवळपास साडे चार लाखांच्या फरकाने प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात केली. तर जळगावचे भाजप उमेदवार उन्मेश पाटील यांनीही 4 लाख 10 हजाराच्या फरकाने विजय मिळवला.

शिवसेना आणि भाजपने अनुक्रमे 23 आणि 25 जागांवर उमेदवार उतरवले होते. भाजपने सर्वाधिक यश मिळवत 23 उमेदवार विजयी झाले आहेत. तर फक्त दोन उमेदवारांचा पराभव झाला. बारामतीमधून कांचन कुल आणि चंद्रपुरातून हंसराज अहिर यांचा पराभवाचा सामना करावा लागला. बारामतीत भाजपने अगोदरपासूनच विजयाचा दावा केला होता, पण सुप्रिया सुळेंनी एकतर्फी विजय मिळवला.

केंद्रीय मंत्र्याचा पराभव

केंद्रीय गृहराज्यमंत्री असलेले हंसराज अहिर यांचा काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांनी पराभव केला. काँग्रेसला राज्यात चंद्रपूरची एकमेव जागा जिंकता आली आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांपासून ते दिग्गज नेत्यांपर्यंत सर्वांचा पराभव झालाय. त्यात चंद्रपूरमध्ये आश्चर्यकारक विजय मिळाला, ज्यात केंद्रीय मंत्र्यांचाच पराभव झाला.

बारामतीत एकतर्फी लढत

2014 ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने सुप्रिया सुळेंची दमछाक केली होती. पण यावेळी सुप्रिया सुळेंनी सहज विजय मिळवला. भाजपने बारामतीत संपूर्ण ताकद पणाला लावली होती. मोठं आव्हान निर्माण करण्यात यश आलं असलं तरी सुप्रिया सुळेंनी बालेकिल्ला शाबूत ठेवण्यात यश मिळवलंय.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.