AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Polls | मास्कमुळे कोव्हिडपासून, तर मतदानामुळे बिहारचा ‘बिमार’ होण्यापासून संरक्षण : मोदी

ज्यांनी फक्त आपल्या कुटुंबाचा विचार केला, त्यांना कधी बिहारची अपेक्षा समजू शकत नाही, अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.

Bihar Polls | मास्कमुळे कोव्हिडपासून, तर मतदानामुळे बिहारचा 'बिमार' होण्यापासून संरक्षण : मोदी
| Updated on: Oct 28, 2020 | 5:04 PM
Share

पाटणा : ज्याप्रमाणे मास्क घालून तुम्ही कोव्हिडपासून स्वतःचे संरक्षण करु शकता, त्याप्रमाणे मतदान करुन बिहारला ‘बिमार’ (आजारी) होण्यापासून वाचवू शकता, अशी शाब्दिक कोटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. बिहार विधानसभा निवडणुकांच्या प्रचारानिमित्त पाटण्यातील रॅलीला मोदींनी संबोधित केले. (PM Narendra Modi addresses an election rally in Patna takes jibe on Bihar Bimar)

“गेल्या दीड दशकात बिहारने नितीशजींच्या नेतृत्वात गोंधळापासून सुशासनाकडे वेगाने वाटचाल केली आहे. एनडीए सरकारच्या प्रयत्नांमुळे बिहारने गैरसोयीपासून सोयीसुविधांपर्यंत, अंधकारापासून प्रकाशाकडे, अविश्वासापासून विश्वासापर्यंत, उद्योगांच्या पळवापळवीपासून संधींपर्यंत बराच मोठा टप्पा गाठला आहे.” असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

“अटलबिहारी वाजपेयी म्हणायचे की बिहारमधील विजेची व्याख्या ही आहे की कनेक्शन नाहीये. कंदील काळातील काळोख आता संपला आहे” असेही मोदींनी पुढे जोडले.

“बिहारमधील गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या आकांक्षा कोण पूर्ण करु शकेल? ज्यांनी बिहारची लूट केली ते हे करु शकतात? ज्यांनी फक्त आपल्या कुटुंबाचा विचार केला आणि सर्वांवर अन्याय केला, त्यांना कधी बिहारची अपेक्षा समजू शकत नाही. केवळ एनडीएच हे करु शकते” अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.

हेही पाहा : Bihar Election 2020 : तोंडाला मास्क, हातात ग्लोव्हज, बिहार निवडणुकीच्या मतदानाचे फोटो

“यापूर्वी रुग्णालयात डॉक्टर सापडणे कठीण होते. आता वैद्यकीय महाविद्यालये आणि एम्ससारख्या सुविधा येथे आहेत. पूर्वी खेड्यापाड्यात अशी मागणी होती की कशीतरी ही दरी मिटवा, परंतु आता प्रत्येक हंगामात चांगल्या स्थितीत राहणाऱ्या रुंद रस्त्यांची जनतेला अपेक्षा आहे.” असे मोदी म्हणाले.

बिहारमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. दुसर्‍या टप्प्यातील मतदान तीन नोव्हेंबर, तर तिसर्‍या टप्प्यासाठी सात नोव्हेंबर रोजी मतदान होईल. त्यानंतर दहा नोव्हेंबरला मतमोजणीनंतर निकाल जाहीर होईल.

संबंधित बातम्या :

“आली-आली-आली, गेली-गेली-गेली”, भाजप अध्यक्षांकडून प्रचारात बिहारमधील लहानपणीचा किस्सा

राहुल गांधी यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार, आचारसंहिता भंगाचा भाजपचा आरोप

(PM Narendra Modi addresses an election rally in Patna takes jibe on Bihar Bimar)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.