AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra budget 2021 : ‘पृथ्वीराज चव्हाणांसह 20-25 आमदारांना विधानभवनातून परत पाठवलं’

कोरोना चाचणी न केल्याने (Corona Test) तब्बल 20 ते 25 आमदारांना विधानभवनातून (Maharashtra Vidhan Bhawan) परत पाठवल्याचा दावा, सपा नेते अबू आझमी (Abu Azmi) यांनी केला आहे.

Maharashtra budget 2021 : 'पृथ्वीराज चव्हाणांसह 20-25 आमदारांना विधानभवनातून परत पाठवलं'
पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते
| Edited By: | Updated on: Mar 08, 2021 | 2:11 PM
Share

मुंबई : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प (Maharashtra budget 2021) आज सादर होत आहे. मात्र सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं दिसत आहे. कारण कोरोना चाचणी न केल्याने (Corona Test) तब्बल 20 ते 25 आमदारांना विधानभवनातून (Maharashtra Vidhan Bhawan) परत पाठवल्याचा दावा, सपा नेते अबू आझमी (Abu Azmi) यांनी केला आहे. अबू आझमी म्हणाले, “माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह 20-25 आमदारांना कोरोना टेस्ट न केल्यानं त्यांना प्रवेश दिला गेलेला नाही. दुसऱ्यांदा कोरोना टेस्ट करण्याची माहिती त्यांना दिलेली नव्हती.संवांदाचा अभाव इथं दिसतोय. आज अर्थसंकल्पाचा दिवस असल्यानं त्यांना विधानभवनात बसण्याची परवानगी द्यायला हवी होती”

सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील काही आमदारांना माघारी जावे लागले. कोव्हिड टेस्ट केली नसल्याने त्यांना परत पाठविण्यात आले आहे. 8 ते 10 आमदारांनी आतापर्यंत आर टी पी सी आर टेस्ट केली आहे. त्याचा रिपोर्ट आल्यावर त्यांना सभागृहात सोडण्यात येणार आहे

कोरोना चाचणीनंतरच प्रवेश

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी अधिवेशनाला हजर राहणाऱ्या आमदार, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार अशा सर्वांची कोरोना चाचणी करणे बंधनकारक होतं.  एका आठवड्यात सलग चार दिवस अधिवेशनाचे कामकाज चालवायचे. यानंतर तीन दिवस सुट्टी द्यायची.  त्यानंतर अधिवेशनाच्या पुढील आठवड्यात कामकाज सुरु करण्यापूर्वी पुन्हा एकदा सर्वांची कोरोना चाचणी करायची. यामुळे जर तीन दिवसांच्या कालावधीत कोणाला कोरोनाची लागण झाली, तर त्यांना अधिवेशनात येण्यापासून रोखता येईल. अशा पद्धतीने आठवड्यातून चार दिवस कामकाज आणि तीन दिवस सुट्टी या फॉर्म्युल्यानुसार तीन ते चार आठवडे अधिवेशन चालवता येईल, असं नियोजन राज्य सरकारने केलं होतं.

दरम्यान शुक्रवारी सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर शनिवार, रविवार सुट्टी होती. त्यानंतर आज सोमवारी अधिवेशन सुरु झालं. त्यावेळी आमदारांनी पुन्हा RTPCR टेस्ट करणे आवश्यक होतं. मात्र काही आमदारांपर्यंत हा मेसेज न पोहोचल्याने त्यांनी पुन्हा चाचणी न करता अधिवेशनाला हजेरी लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना परत पाठवण्यात आलं.

संबंधित बातम्या  

Maharashtra Budget 2021 LIVE Updates | उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर

अधिवेशनापूर्वी कोरोना चाचणी, मग 4 दिवस कामकाज आणि 3 दिवस सुट्टी, बजेट सत्रासाठी प्लॅनिंग काय?

ठाकरे सरकारमधील अर्ध्या मंत्रिमंडळाला कोरोना, कुणाची कोरोनावर मात, तर कोण अजूनही पॉझिटिव्ह

राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला सादर करणार, अजित पवारांची माहिती 

(Prithviraj Chavan and 20-25 MLAs were sent back from the Maharashtra Vidhan Bhavan for not doing the corona test claim Abu Azmi)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.