AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मोदींचा मुकाबला राहुलच करु शकतात!’ अशोक गेहलोत म्हणतात, ‘राहुल यांनी काँग्रेस अध्यक्ष व्हावं’

Ashok Gehlot on Rahul Gandhi : सोनिया गांधी याच्याऐवजी पुन्हा एकदा राहुल गांधी यांना पूर्णवेळ काँग्रेसचं अध्यक्षपद दिलं जावं, अशी कुजबूज सुरु झाली आहे. त्यातच अशोक गेहलो यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या नावाचा पुनरुच्चार केलाय.

'मोदींचा मुकाबला राहुलच करु शकतात!' अशोक गेहलोत म्हणतात, 'राहुल यांनी काँग्रेस अध्यक्ष व्हावं'
काँग्रेस अध्यक्षपदावरुन पुन्हा नव्या चर्चांना उधाणImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Mar 13, 2022 | 5:10 PM
Share

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह देशाच्या पाच राज्यात झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर आता गांधी परिवारावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोनिया गांधी (Sonia Gandhi) याच्याऐवजी पुन्हा एकदा राहुल गांधी यांना पूर्णवेळ काँग्रेसचं अध्यक्षपद (Congress President) दिलं जावं, अशी कुजबूज सुरु झाली आहे. त्यातच अशोक गेहलो यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नावाचा पुनरुच्चार केलाय. राहुल गांधी यांनी काँग्रेसचं नेतृत्त्व करायला हवं, असं मत अशोक गेहलोत यांनी व्यक्त केलंय. पाचही राज्यात काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलंय. तर दुसरीकडे भाजपनं मुसंडी मारली आहे. त्यामुळे काँग्रेसवर पुन्हा एकदा आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. अशातच काँग्रेसचे वरीष्ठ नेता अशोक गेहलोत हे पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या समर्थनात पुढे आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्षपदावरुन होत असलेलं राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आलंय.

काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक सध्या सुरु असून या बैठकीत पाचही राज्यात झालेल्या पराभवांवर महत्त्वपूर्ण चर्चा केली जाते आहे. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पार पडतेय.

काँग्रेस पक्षाला एकजूट ठेवण्यासाठी अध्यक्षपदी काँग्रेच्या अध्यक्षपदी गांधी परिवारातीलच व्यक्ती असणं गरजेचं आहे, असंही मत त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष होण्याच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणं टाळलं असून मी सध्या जेत करतो, तेच माझ्यासाठी चांगलं आहे, असंही अशोक गेहलोत यांनी म्हटलंय.

भाजपकडून मतांचं ध्रूवीकरण?

पंजाब बळकता इतर चार राज्यात भाजपनं दणदणीत विजय मिळवलाय. यूपीसह, मणिपूर, गोवा या राज्यात भाजपनं मुसंडी मारली होती. मात्र भाजपच्या या विजयामागे मतांचं ध्रूवीकरण झालं असल्याचा आरोप अशोक गेहलोत यांनी केला आहे. काँग्रेस पक्ष नेहमीच गांधीच्या विचारांवर चालत आला आहे. राज, धर्म यावर काँग्रेसनं निवडणुका लढलेल्या नाहीत. सत्याचाच विजय होईल, असा विश्वासही गेहलोत यांनी व्यक्त केला आहे.

माध्यमांवर हल्लाबोल

दुसरीकडे अशोक गेहलोत यांनी माध्यमांवरही हल्लाबोले केला आहे. मीडिया पीएम मोदी आणि अमित शाह यांच्या दबावाखाली काम करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर दुसरकडे पंजाबात काँग्रेससह प्रस्थापितांना मात देणाऱ्या आप पक्षाचा काँग्रेसला कोणताही धोका नाही, असंही ते म्हणालेत. मीडिया आपला वाढीव कव्हरेज देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

संबंधित बातम्या :

बाहेर पडला की पाऊस अन् टिव्ही लावला की राऊत, हसन मुश्रीफांची जोरदार फटकेबाजी

मुख्यमंत्री पदावरून प्रमोद सावंत, विश्वजीत राणेंमध्ये शीतयुद्ध; जाहिरातीतून सावंतांचा फोटो गायब

VIDEO: सर्व पुरावे केंद्रीय गृहसचिवांना का दिले?, घोटाळ्यात कोण कोण अडकलंय: देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच उघड केलं कारण

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.