AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election 2022: इस ‘शोले’ के ठाकूर किसके संग? सत्तार म्हणतात, ठाकूर आमच्याकडेच !

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीचा रणसंग्राम सध्या महाराष्ट्राच्या विधान भवनात सुरु आहे. यात मातब्बर नेत्यांनी केलेल्या दाव्यांनी अफवांना उधाण आलंय. बहुजन विकास आघाडीच्या आमदारांच्या सस्पेन्समुळे तर भाजप आणि मविआ दोन्हीकडे चांगलीच अस्वस्थता आहे.

Rajya Sabha Election 2022: इस 'शोले' के ठाकूर किसके संग? सत्तार म्हणतात, ठाकूर आमच्याकडेच !
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 10, 2022 | 11:55 AM
Share

मुंबईः राज्यसभा निवडणुकीच्या (Rajyasabha Election) रणसंग्रामाला सुरुवात झाली असून प्रत्येक मिनिटाला राजकीय पक्षांची धाकधुक वाढत आहे. कालपासून राजकीय गोटात अफवांचं पिक आलं असून नेत्यांकडून मोठ-मोठाले दावे केले जात आहे. कोणता आमदार कोणत्या पक्षाला मतदान करणार, दिलेलं वचन मोडणार की पक्षाशी एकनिष्ठ राहणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यातच बहुजन विकास आघाडीच्या (Bahujan Vikas Aghadi) तीन आमदारांनी आपलं मत अजूनही गुलदस्त्यात ठेवलं आहे. बविआचे नेते हितेंद्र ठाकूर हे मतदानासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मात्र अद्याप त्यांनी मतदानाबाबत स्पष्ट वक्तव्य केलेलं नाही. दुपारी दोन वाजता आमचं मत कुणाला आहे, हे कळणार असल्याचं हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी म्हटलंय. मात्र इकडे शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांनी मात्र ठाकूरांबाबत छातीठोकपणे दावा केलाय. सगळे ठाकूर आमच्याच बाजूने मतदान करणार असल्याचं ते म्हणाले.

बहुजन विकास आघाडीचं सस्पेन्स

बहुजन विकास आघाडीचे विरारचे आमदार हितेंद्र ठाकूर, नालासोपाऱ्याचे क्षितीज ठाकूर, भोईसरचे आमदार राजेश पाटील या तीन आमदारांचं मत महाविकास आघाडीला जाणार की भाजपाला जाणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या निवडणुकीसाठीची ही लढाई शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढवणारी ठरत आहे. यातच बहुजन विकास आघाडीनं आपला सस्पेन्स कायम ठेवला आहे. सध्या हितेंद्र ठाकूर आणि इतर दोन आमदार आता मुंबईतील विधान भवनाच्या दिशेने रवाना झाले आहेत. दुपारी दोन वाजता ते मतदान करतील. तोपर्यंत भाजप आणि महाविकास आघाडी या दोन्ही गोटातील अस्वस्थता कायम राहणार असं दिसतंय.

‘ठाकूर आमच्याकडेच’

राज्यसभेच्या निवडणुकीसाठीचं गणित अत्यंत क्लीष्ट तेवढंच राजकीय दृष्ट्या रंजक असल्यानं एका-एका आमदाराचं मत तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या मतांकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. यातच महाविकास आघाडीतील मंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजपाच्या पोटात गोळा आला आहे. हितेंद्र ठाकूरांची सर्व मतं आमच्याच बाजूने आहेत, असा दावा त्यांनी केलाय. त्यामुळे मविआकडे ही मते जाणार की काय, अशा चर्चांना उधाण आलं आहे.

‘दावनेंचे पुत्रही आमच्याकडेच’

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दावे आणि अफवांचं पेवच फुटलंय. अब्दुल सत्तारांनी आज सिक्सर मारत जालना जिल्ह्यातील भोकरदन विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोष दानवेही आमच्याबाजूने मतदान करणार असल्याचा दावा केला. भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे ते पुत्र आहे. दानवेंनी ज्या विश्वासानं हा दावा केला, त्यावरून आणखीच चर्चा उठल्या आहेत.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.