AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुशांतची हत्या झाली नाही असं AIIMS बोलू शकत नाही : रामदास आठवले

रामदास आठवले यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एम्स (AIIMS) सुशांतची हत्या झाली नाही असं बोलू शकत नाही, असं मत व्यक्त केलं आहे.

सुशांतची हत्या झाली नाही असं AIIMS बोलू शकत नाही : रामदास आठवले
| Updated on: Oct 07, 2020 | 4:03 PM
Share

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एम्स (AIIMS) सुशांतची हत्या झाली नाही असं बोलू शकत नाही, असं मत व्यक्त केलं आहे (Ramdas Athawale on Sushant Singh death case and Mumbai Police). यावेळी त्यांनी त्यांच्यावर होत असलेल्या मुंबई पोलिसांच्या बदनामाच्या आरोपावरही सारवासारव केली. आम्ही सरकारविरोधात कोणतीही रणनीती आखली नव्हती. आमचा मुंबई पोलिसांवर विश्वास होता. ते केवळ सुशांत प्रकरणाचा तपास धीम्या गतीने करत असल्याचा आमचा आरोप होता, असं रामदास आठवले म्हणाले.

रामदास आठवले म्हणाले, “अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या बाबतीत अनेक प्रश्न समोर आले होते. सीबीआयच्या हाती सुद्धा काही मिळत नाहीये. एम्स आपल्या रिपोर्टमध्ये हत्या झाली नाही असं बोलू शकत नाही. आम्ही सरकारबाबत कोणतीही रणनीती केली नाही. आमचा मुंबई पोलिसांवर विश्वास आहे, मात्र सुशांत सिंह प्रकरणाचा तपास त्यांनी धीम्या गतीने केला. आम्ही सरकारच्या विरोधात काहीही केलेले नाही. राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी आम्ही कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. आम्ही सरकारला बदनाम करण्याचं काम केलं नाही. रियाला जामीन मिळाला ते ठीक आहे, मात्र मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये ड्रग्सचा वापर करु नये.”

“मी हाथरसमध्ये जाऊन त्या पीडित कुटूंबाची भेट घेतली आणि त्यांना 5 लाख रुपयांची मदत केली. योगी सरकारने सीबीआय तपासाची शिफारस केली आहे. जी घटना झाली आहे त्यामध्ये तरुणीची मान आणि मनका तुटलेला होता. अशा घटनांचं राजकारण करु नये. राजस्थानमध्ये अशा घटना होत असताना राहुल गांधी तेथे का आंदोलन करत नाहीत?”, असाही सवाल रामदास आठवले यांनी विचारला.

‘नटींच्या भीडमध्ये नाही, कार्यकर्त्यांच्या गर्दीत’

शिवसेना खासदार संजय राऊत यांना उत्तर देताना रामदास आठवले म्हणाले, “मी कंगनाला मानवतेच्या दृष्टीने विचार करुन पाठिंबा दिला. कंगना जे बोलली आहे त्याचं मी समर्थन करत नाही. मी हाथरसमध्ये जाऊन आलो आता संजय राऊत कधी जाणार आहेत? मी नट्यांच्या गर्दीमध्ये नाही, तर कार्यकर्त्यांच्या गर्दीत राहतो. संजय राऊत यांनी अशा प्रकारची वक्तव्य करु नयेत, ते माझे मित्र आहेत.”

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना रामदास आठवले म्हणाले, “शरद पवार माझे चांगले मित्र आहेत. मी जी भूमिका मांडतो ती ते गांभिर्याने घेतात. त्यांच्या टीकेवर मी काही उत्तर देणार नाही. कोणाला माझी भूमिका आवडत असेल अथवा नसेल.”

संबंधित बातम्या :

नटीच्या घराची कौलं उडवली तरी आंदोलन, हाथरस प्रकरणानंतर आठवले कुठे गेले? संजय राऊतांचा निशाणा

रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का? आठवलेंच्या ऑफरवर पवारांच्या कानपिचक्या

दलित अत्याचाराविरुद्ध कधीही आवाज न उठवणाऱ्या संजय राऊत यांनी आम्हाला शिकवू नये : रामदास आठवले

Ramdas Athawale on Sushant Singh death case and Mumbai Police

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.