Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ तीन प्रश्नांवर तोडगा नाही, देश चालतो कसा?; सामनातून ‘रोखठोक’ सवाल

Saamana Editorial on PM Narendra Modi : 'ते' तीन प्रश्न, तोडगा अन् केंद्र सरकारला सवाल; आजच्या सामना अग्रलेखात नेमकं काय?

'या' तीन प्रश्नांवर तोडगा नाही, देश चालतो कसा?; सामनातून 'रोखठोक' सवाल
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 7:57 AM

मुंबई : सामनाच्या रविवारच्या रोखठोक या सदरातून सवाल विचारण्यात आलाय. राज्य कसे चालले आहे? याचे उत्तर आज कुणीच देऊ शकत नाही. मणिपूरची आग विझवता येत नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्यासाठी ट्विटरवर दबाव आणला गेला. राज्यकर्त्यांच्या ‘आरामगिरी’वर कोटयवधी उधळले जात आहेत. चीनने सीमेवर विमानतळ उभे केले, पण राज्य चालवणारे गप्प आहेत!, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागातून रोजच्या रोज ज्या तणावाच्या आणि हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत त्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत. मणिपूरसारखे राज्य पेटलेलेच आहे. आतापर्यंत शेकडो घरे, गाडय़ा, व्यवसाय भस्मसात झाले व पाचशेच्या आसपास लोक त्या हिंसेत मरण पावले. पंजाब आणि कश्मीरप्रमाणे मणिपूरचा प्रश्न चिघळत चालला आहे व गृहमंत्री अमित शहा निवडणुकांच्या राजकारणात स्वतःला गुंतवून घेत आहेत.

मणिपूरसारख्या लहान राज्यात गृहमंत्री शांतता प्रस्थापित करू शकले नाहीत. मणिपूरमध्ये वर्गकलहाने हिंसाचाराचा उद्रेक झाला व हे राज्य तुटेल असे चित्र आहे. पंतप्रधान मोदी ‘पोन-रशियाच्या युद्धात मध्यस्थी करू शकतात (असे भक्त सांगतात), पण मणिपूरमधील दोन जमातींमधला कलह सोडवू शकत नाहीत. हे चित्र चांगले नाही, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

मोदी-शहांचे राज्य नेमके कसे चालले आहे? याचा खुलासा ‘ट्विटर’चे माजी ‘सीईओ’ जॅक डोर्सी यांनी केला आहे. सरकारविरोधी भूमिकांना ‘ट्विटर’वर स्थान देऊ नका, असा दबाव असल्याचा स्फोट डोर्सी यांनी केला.

भारत सरकारने शेतकरी आंदोलनादरम्यान दबाव आणला होता की, आंदोलनासंदर्भातल्या बातम्या व भूमिकांना स्थान देऊ नका. आमचे ऐकले नाहीत तर भारतातील ‘ट्विटर’ कार्यालय बंद पाडू व तुमच्या कर्मचाऱ्यांवर धाडी घालू.” डोर्सी खोटे बोलत आहेत असा कांगावा आता केंद्राचे एक मंत्री चंद्रशेखर करीत आहेत. जॅक डोर्सी यांना खोटे बोलण्याचे तसे काहीच कारण नाही. पण खोटे बोलावे, सत्य दडपावे यासाठी मोदी सरकारकडे भरपूर कारणे आहेत. या देशाचे सध्याचे राज्यकर्ते किती डरपोक आहेत हे या प्रकरणातून स्पष्ट होते. हुकूमशहा हा डरपोकच असतो. चार गाढवे एकत्र चरत असली की हुकूमशहाला त्या चार गाढवांची भीती वाटू लागते. ही चार गाढवे आपल्या विरोधात काही कारस्थाने तर करीत नसतील ना? या चिंतेने तो अस्वस्थ होतो. आपल्या देशात नेमके तेच सुरू आहे, असं म्हणत जॅक डोर्सी यांच्या वक्तव्यावर रोखठोकमधून भाष्य करण्यात आलं आहे.

सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल.
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?.
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका.
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?.
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं..
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं...
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली.
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात.
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब.
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.