AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai : शिवसेनेचं मुंबईत ‘मिशन 150’, किशोरी पेडणेकरांनी केला बाप्पाच्या साक्षीने दावा..!

गेल्या 25 वर्षापासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. मात्र, हेच मोडीत काढण्यासाठी आता भाजपाकडून सर्वतोपरी तयारी केली जात आहे. आगामी दोन दिवस गृहमंत्री अमित शाह देखील मुंबईत दाखल होत आहेत. असे असले तरी महापालिकेवर भगवाच कायम राहणार असा दावा केला जात आहे.

Mumbai :  शिवसेनेचं मुंबईत 'मिशन 150', किशोरी पेडणेकरांनी केला बाप्पाच्या साक्षीने दावा..!
शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर
| Updated on: Sep 03, 2022 | 5:37 PM
Share

मुंबई : राज्यात सुरु असलेल्या राजकारणाला (Mumbai Municipal Election) मुंबई महापालिका निवडणूकांची किनार ही आहेच. आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन सर्वकाही सुरु आहे. एकीकडे मुंबई महापालिकेवर कमळ फुलवण्यासाठी (BJP Party) भाजपाकडून सर्वतोपरी तयारी केली जात असतनाच दुसरीकडे या निवडणुकीत (Shiv Sena) शिवसेना 150 जागांवर निवडूण येणार असा दावा किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. त्यामुळे बदलत्या राजकीय परस्थितीचा परिणाम मुंबई महापालिका निवडणूकांवर होणार की, शिवसेनेचे वर्चस्व कायम राहणार हे देखील पहावे लागणार आहे.

महापालिकेसाठी शिवसेनेचा 150 चा नारा

गेल्या 25 वर्षापासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. मात्र, हेच मोडीत काढण्यासाठी आता भाजपाकडून सर्वतोपरी तयारी केली जात आहे. आगामी दोन दिवस गृहमंत्री अमित शाह देखील मुंबईत दाखल होत आहेत. असे असले तरी महापालिकेवर भगवाच कायम राहणार असा दावा केला जात आहे. किशोरी पेडणेकर यांनी तर यंदाच्या निवडणुकांमध्ये सेनेच्या जागांमध्ये वाढ होऊन हा आकडा 150 असेल असे सांगितले आहे.

भाजपाची रणनिती काय?

राज्यातील राजकीय भूकंपाचा फायदा घेण्याचा प्रयत्न भाजपाचा राहणार आहे. त्यामुळेच आतापासून निवडणुकीची रणनिती कशी राहणार याबाबत पदाधिकारी मेळावे, नियुक्त्या आदी प्रक्रिया पूर्ण केल्या जात आहेत. शिवाय आगामी दोन दिवस गृहमंत्री अमित शाह हे मुंबईतच असणार आहेत. या दरम्यान, मुंबई महारपालिका निवडणूकीच्या अनुशंगाने काय धोरण ठरते हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मनसेला विचारधारा राहिली नाही

मनसेच्या भूमिकेबाबत किशोरी पेडणेकर यांनी पक्ष नेतृत्वावरुन सडकून टीका केली आहे. राज ठाकरे हे उद्या कोणाच्याही व्यासपीठावर दिसतील. याबाबत नवखे असे काही राहणार नाही. ते फक्त शिवसेना आणि उद्धव ठाकरे आहेत त्या व्यासपीठावर येणार नाहीत असेही पेडणेकर ह्या म्हणाल्या आहेत. यामुळे पक्षाला कोणती विचारधाराच राहिलेली नाही हेच स्पष्ट होते असा आरोपही त्यांनी केला आहे.

बाप्पाच्या साक्षीनेच पेडणेकरांचा दावा

शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर ह्या TV9 मराठी कार्यालयातील बाप्पांच्या दर्शनासाठी दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांनी बाप्पाच्या साक्षीने मुंबई महापालिकेवर सेनेचे 150 नगरसेवक असणार हा दावा केला. तर मनसेची बदलती भूमिका ही कशामुळे जनतेला माहित असल्याचेही त्या म्हणाल्या. नेत्यांमध्ये बदल होतील पण शिवसैनिकांमध्ये नाही असे म्हणत त्यांनी मुंबई महापालिका शिवसेनेचीच असे ठासून सांगितले आहे.

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.