Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात हुकुमशाहीचं टोक गाठलं, विरोधकांना चिरडण्याची पद्धत हिटलरपेक्षाही भयंकर, स्वातंत्र्यासाठी पुन्हा लढावं लागणार, संजय राऊतांचा अयोध्येतून प्रहार!

न्यायालयापासून निवडणूक आयोगापर्यंत सगळेच दबावाखाली आहेत. आमच्या सगळ्यांच्या बाबतीत हे सिद्ध होतंय. शिवसेनेचं मत बाद करण्यासाठी साडेसात तास लावले. मुंबईतून निवडणूक आयोगाशी कोण बोलत होतं, कोया सूचना, माहिती दिली जात होती, हे सगळं आम्हाला माहिती आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. 

देशात हुकुमशाहीचं टोक गाठलं, विरोधकांना चिरडण्याची पद्धत हिटलरपेक्षाही भयंकर, स्वातंत्र्यासाठी पुन्हा लढावं लागणार, संजय राऊतांचा अयोध्येतून प्रहार!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 10:21 AM

लखनौ : देशात केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत विरोधकांना त्रास देण्याचा कार्यक्रम सुरु आहे. ही हुकुमशाहीची (Dectetoeship) सुरुवात नाही तर हुकुमशाहीचं टोक म्हणावलं लागेल. विरोधकांना चिरडण्याची ही पद्धत हिटलरपेक्षाही भयंकर असल्याची टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. लखनौ येथून पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं. शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे पर्यवरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray in Ayodhya) यांचा आज अयोध्या दौरा आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत अयोध्येत आहेत. यावेळी पत्रकारांना त्यांनी आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यातील कार्यक्रम स्पष्ट केला. तसेच शिवसेनेच्या हिंदुत्वावर होणारी टीका तसेच राहुल गांधी यांची नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी होत असलेली चौकशी आदि विविध मुद्द्यांवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली.

‘देशात हुकुमशाहीचं टोक गाठलं जातंय’

केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजप नेतृत्वाकडून गैरवापर सुरु आहे, असा आरोप करताना संजय राऊत म्हणाले, ‘ पक्षवाढीसाठी काम करणाऱ्यांना केंद्रीय तपास यंत्रणा त्रास देत आहेत. राहुल गांधी यांची नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात रात्री 12 वाजेपर्यंत चौकशी होतेय. ही हुकुमशाहीची सुरुवात नाही तर हुकुमशाहीचं टोक गाठलंय. आपली सत्ता टिकवण्यासाठी एवढ्या जुलमी पद्धतीनं विरोधकांना चिरडण्याचं काम हिटलरनंही केलं नसेल. जगभरात हिंदुस्तानच्या लोकशाहीचे जगभरात दाखले दिले जातात. त्या देशात लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले जात आहे. हा आमच्या स्वातंत्र्याचा पराभव आहे. तो पराभव भाजपच्या नेतृत्वाखाली करतंय. त्यामुळे आणखी एका स्वातंत्र्याची लढाई आपल्याला करावी लागणार आहे.

‘कोणतीच यंत्रणा निष्पक्ष राहिली नाही’

संजय राऊत म्हणाले, ‘ शिवसेनेचे सहकारी अनिल परब यांच्या कारकीर्दाचा अभ्यास केला तर ही केस त्यांच्यावर कोणत्या पद्धतीने लादली गेलीय, याच आश्चर्य वाटेल. राज्यसभा निवडणुकीतही केंद्रीय यंत्रणांचा वापर करून .. सुहास कांदे यांचं मत बाद करण्यापासून.. अडचणीत आणण्याचं काम केलं. देशातील कोणती यंत्रणा स्वतंत्र, निष्पक्षनाही. न्यायालयापासून निवडणूक आयोगापर्यंत सगळेच दबावाखाली आहेत. आमच्या सगळ्यांच्या बाबतीत हे सिद्ध होतंय. शिवसेनेचं मत बाद करण्यासाठी साडेसात तास लावले. मुंबईतून निवडणूक आयोगाशी कोण बोलत होतं, कोया सूचना, माहिती दिली जात होती, हे सगळं आम्हाला माहिती आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा कसा?

– 1.30 वाजता अयोध्येत आगमन होईल. -3.30 वाजता पत्रकार परिषद घेतील – 4.45 वाजता इस्कॉन मंदिरात दर्शन घेतील – 5.30 वाजता राम लल्लांचे दर्शन घेतील – 6.30 वाजता शरयू तीरावर महाआरती होईल – 7.30 लखनौसाठी प्रस्थान करतील आणि तेथून मुंबईत परततील.

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.