AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमचे राज्यात 22 खासदार होणार, 2024 मध्ये शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी : संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेक सूचक वक्तव्ये केली. शिवसेना राष्ट्रीय राजकारणात आहेच. भविष्यात आमचे 22 खासदार होतील, असं भाकित त्यांनी वर्तवलं आहे.

आमचे राज्यात 22 खासदार होणार, 2024 मध्ये शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी : संजय राऊत
संजय राऊत, शिवसेना नेते.
| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 11:34 AM
Share

मुंबई : राज्याची सत्ता हाती आल्यापासून शिवसेनेने आपल्या विस्तारासाठी प्रयत्न सुरु केलेला आहे. राज्य तसेच राष्ट्रीय राजकारणात आपलं स्थान बळकट करण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी तसेच केंद्रीय पातळीवरच्या नेत्यांशी संपर्क वाढवलेला आहे. तसेच पक्षविस्तारासंदर्भात ते वेगवेगळी विधानं करताना दिसतात. आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानिमित्त बोलताना त्यांनी अनेक सूचक वक्तव्ये केली. शिवसेना राष्ट्रीय राजकारणात आहेच. दादरा आणि नगर हवेलमीमधून आमचा आणखी एक खासदार निवडून होईल. आमचा आकडा 22 वर जाईल, असं भाकित त्यांनी वर्तवलं आहे.

आगामी निवडणुकीत आमचे 22 खासदार असतील

संजय राऊत आज माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलत असताना त्यांनी शिवसेनेची आगामी वाटचाल, भूमिका यावर भाष्य केले. 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील एकूण 48 जागांपैकी 18 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला होता. आता संपूर्ण देशाला 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. या निवडणुकीत शिवसेना केंद्रस्थानी असेल, असे भाकीत संजय राऊत यांनी वर्तवले आहे. “शिवसेना पक्षप्रमुख पक्षाची दिशा ठरवतील. ठाकरे यांचे भाषण सकाळी 7.30 वाजता सुरु होईल. शिवसेना कोणती भूमिका घेणार हे पूर्ण देश समजून घेऊ इच्छत आहे. शिवसेना राष्ट्रीय राजकारणात आहेच. आता आमचे 22 खासदार होतील. 2025  नंतर शिवसेना देश पातळीवरील राजकारणात केंद्रस्थानी असेल,” असे संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारे काम

तसेच पुढे बोलताना “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं आजचं भाषण महत्वाचं आहे. महाराष्ट्र आणि देशात अनेक घटना घडल्या आहेत. यावेळी शिवतीर्थावर दसरा मेळावा होऊ शकत नाही. पण सर्व नियमाचं पालन करून मेळाव्याचे आोयजन करण्यात येत आहे. शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारे काम होईल, असेदेखील संजय राऊत म्हणाले.

एनसीबीच्या कारवाईतील पैशांचा वापर देशविरोधी कारवायांसाठी 

विशेष म्हणजे पुढे बोलताना राऊत यांनी नोटबंदी, अमली पदार्थ तसेच इतर मुद्द्यांवर भाष्य केलं. अमली पदार्थांची तस्करी तसेच उलाढाल यांच्यातून येणारा पैसा हा देशविरोधी कारवायांसाठी वापरण्यात येतो, असं आरएएसचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात. देशात प्रखर राष्ट्रवादी सरकार आहे. तरीही देशात असं होत असेल तर ते चुकीचं आहे. सरसंघचालक मोहन भागवत कोणाला जबाबदार धरणार आहेत. नोटबंदी करताना मोदी यांनी देशाला वचन दिलं. पण तसं काही झालं नाही. याच मुद्द्यावरुन चार वर्षानंतर सरसंघचालक चिंता व्यक्त करत केलेली आहे, त्यांच्या बोलण्याला एक महत्त्व असतं, असं संजय राऊत म्हणाले.

इतर बातम्या :

शरद पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर, पालिका निवडणुकांच्या तोंडावर नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न

विजयादशमीच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदी करणार सात नव्या संरक्षण कंपन्यांचं लोकार्पण

विजयादशमीच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदी करणार सात नव्या संरक्षण कंपन्यांचं लोकार्पण

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.