AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई, ठाणे वगळता इतर ठिकाणी युती होणं अवघड, नीलम गोऱ्हेंचं मोठं विधान!

राज्यातील राजकीय पक्षांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहे. नाशिक, पुणे, मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्ष रणनीती आखत आहेत.

मुंबई, ठाणे वगळता इतर ठिकाणी युती होणं अवघड, नीलम गोऱ्हेंचं मोठं विधान!
neelam gorhe
| Updated on: Apr 17, 2025 | 3:56 PM
Share

 Neelam Gorhe : राज्यातील राजकीय पक्षांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहे. नाशिक, पुणे, मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्ष रणनीती आखत आहेत. पुन्हा एकदा युती आणि आघाड्यांचा खेळ चालू झाला आहे. असे असतानाच आता शिवसेना पक्षाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या युतीबाबत मोठं विधान केलं आहे. मुंबई, ठाणे वगळता इतर ठिकाणी युती होणे अवघड आहे, असं त्या म्हणाल्या आहेत. त्या पुण्यात शिवसेनेच्या सभासद नोंदणी अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होत्या.

पण अवलंबून राहू नका…

मुंबई, ठाणे वगळता इतर ठिकाणी युती होणे अवघड आहे. झाली तर आनंद आहे. पण अवलंबून राहू नका, असा संदेशच नीलम गोऱ्हे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. तसेच कार्यक्रमानंतर माध्यम प्रतिनिधींशी बातचित करताना “आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सभासद नोंदणी करण्यास सांगितलेलं आहे. पुण्यातील काही विधानसभा मतदारसंघांमध्ये आता आम्ही सभासद नोंदणी सुरू करणार आहोत,” अशी माहिती त्यांनी दिली.

सर्वस्वी निर्णय आमचे वरिष्ठ नेते घेतील

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची नुकतीच भेट झाली आहे. या भेटीनंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी या दोन्ही पक्षांची युती होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “युती होईल का नाही हे माहिती नाही. याचा सर्वस्वी निर्णय आमचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे, देवेंद्रजी फडवणीस आणि अजित पवार घेतील. आपण आपलं काम करत राहतो आणि चांगल्या प्रमाणात पक्ष वाढवावा तेवढेच मला वाटतं. योग्य निर्णय वरिष्ठ घेतील,” अशी सावध प्रतिक्रिया गोऱ्हे यांनी दिली.

बाळासाहेबांनी काँग्रेसवर टीका केली, त्याचबरोबर…

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा नाशिकमध्ये 16 एप्रिल रोजी मेळावा पार पडला. या मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांचे एआय आवाजातील भाषण कार्यकर्त्यांना ऐकवण्यात आले. यावरही गोऱ्हे यांनी ठाकरे गटावर टीका केली. “ते संपूर्ण भाषण मी पाहिलेला आहे. शेवटी ही टेक्नॉलॉजी आहे. जे आपण सांगू तेच त्यामध्ये येतं. बाळासाहेबांनी काँग्रेसवर टीका केली होती. त्याचबरोबर मी पंतप्रधान असतो, तर लाल चौकात जाऊन ध्वजवंदन केलं असतं, असं म्हटलं होतं. हेच काम पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी केलं. 370 कलम हटवलं, तीन तलाक कायदा आणला. त्याचबरोबर लाल चौकात ध्वजवंदन झालं. त्यामुळे खरा विचार आणि खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली पुढे जात आहे,” असे म्हणत बाळासाहेबांचे विचार आम्हीच पुढे नेत आहोत, असा अप्रत्यक्ष दावा गोऱ्हे यांनी केला.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.