AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र संतापला, खवळलेलाय, ‘बंद’ च्या भूमिकेवर संजय राऊत काय म्हणाले?

छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्रातील साडे अकरा कोटी जनतेचा अपमान आहे. या मातीचा अपमान आहे. त्यामुळे तो आम्ही सहन करणार नाहीत,असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

महाराष्ट्र संतापला, खवळलेलाय, 'बंद' च्या भूमिकेवर संजय राऊत काय म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 28, 2022 | 11:26 AM
Share

मुंबईः महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांचा भाजपच्या (BJP) आराध्य दैवतांकडून ज्या पद्धतीने अपमान होतोय… त्यानंतर माफीदेखील मागण्यात येत नाहीये. याउलट आम्हालाच शहाणपण शिकवलं जातंय.. या प्रकारामुळे महाराष्ट्र संतापला आहे. खवळला आहे. याचा उद्रेक कधीही होऊ शकतो, असा इशारा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे. राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात सगळेच पक्ष एकत्र आले असून महाराष्ट्र बंदचा निर्णय कोणत्याही क्षणी होऊ शकतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याविषयी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी आज चर्चा करणार असल्याची महत्त्वाची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

राज्यपालांचा निषेध करताना संजय राऊत म्हणाले, ‘ महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यानंतरही हे सरकार मुठी आवळून उसळून निघत नाहीत? उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे पाऊलं उचलायची आहेत, ती लवकरच उचलत आहोत…

राज्यपालांविरोधात छत्रपती उदयनराजे यांनी घेतलेली भूमिका लोकभावना असल्याचं संजय राऊत म्हणाले. राज्यपालांचे जिथे जिथे कार्यक्रम होतील, ते आम्ही उधळून लावू, असं उदयनराजे म्हणाले होते.

नेहरूंनीही माफी मागितली होती..

महाराष्ट्राने अजून संयम राखला आहे. भाजपाकडून राज्यपाल आणि सुधांशू त्रिवेदी यांचा बचाव केला जातोय, असं कधी घडलं नव्हतं. पंडित नेहरूंकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला होता. त्यावेळी पंतप्रधान असतानाही त्यांनी माफी मागितली होती. मोरार्जी देसाई एवढे मोठे नेते होते. त्यांच्याकडूनही चुकीची विधानं झाली होती. त्यांनीही माफी मागितली होती.

‘पण भाजपाचे टगे…’

महान नेत्यांनी माफी मागितली होती, पण भाजपचे टगे शिवाजी महाराजांचा अपमान करून इतरांना शहाणपण शिकवतायत. त्यामुळे महाराष्ट्र संतापलेला आहे. आतून खवळलेला आहे. याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य करत संजय राऊत यांनी शिंदे-भाजप सरकारला इशारा दिला आहे.

राज्यपालांविरोधात सगळेच पक्ष एकत्र आहेत. शिवसेना सगळ्यात पुढे असली तरी छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्रातील साडे अकरा कोटी जनतेचा अपमान आहे. या मातीचा अपमान आहे. त्यामुळे तो आम्ही सहन करणार नाहीत. या वक्तव्यावर सगळेच पक्ष एकत्र आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.