AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar | अन् अजित पवार म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब, नेमकं काय घडलं?

Ajit Pawar in Pune : अजित पवारांच्या या विधानानं उपस्थित असलेल्या काही जणांच्या भुवया उंचावल्या. राज्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे देखील मंत्री आहेत.

Ajit Pawar | अन् अजित पवार म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब, नेमकं काय घडलं?
अजित पवार आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री का म्हणाले?
| Edited By: | Updated on: Jan 15, 2022 | 2:49 PM
Share

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी चक्क मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचं नाव घेतलं आहे. पत्रकारांशी बोलताना राज्यातील निर्बंध आणि नियमावलीवर भाष्य करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केल्यामुळे अनेकांचा काही काळ गोंधळ उडाला होता. पत्रकारांनी अजित पवार यांना राज्यातील नियम अधिक कठोर होणार का, असा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना अजित पवार यांनी ‘जर ऑक्सिजनची मागणी वाढली तर निर्बंध वाढवण्यासंबंधीचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे घेतील’, असं विधान पत्रकारांशी बोलताना केलं आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्याऐवजी आदित्य ठाकरे यांचं नाव घेतल्यानं आता वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार यांनी हा उल्लेख जाणीवपूर्वक केला ही अनावधानानं केला, अशी आता कुजबूज राजकीय वर्तुळात ऐकू येतेय.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कुणाकुणीची निवड केली, याबाबत माहिती देताना अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी महत्त्वाची विधानं केली आहे. बँका चालवणं हे तसं स्पर्धात्मक झालेलं आहे, असंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान, बँकेच्या वेगवेगळ्या पदांवर कोणाला कोणती जबाबदारी देण्यात आली आहे, याबाबत अजित पवार यांनी माहिती दिली. यानंतर अजित पवार यांनी वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सवाल करण्यात आला. राज्यातील निर्बंध आणखी वाढवले जाणार आहेत का, असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवार यांनी विचारला. त्याला उत्तर देताना अजित पवार यांनी म्हटलं आहे की…

नागरीकांच्या जीवाशी खेळ करुन चालणार नाही. रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी सरकारनं सुरु केलेली आहे. पण जर ऑक्सिजनची मागणी वाढली, तर मात्र निर्बंध वाढवण्यासंबंधीचा निर्णय, राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब घेतील.

अजित पवारांच्या या विधानानं उपस्थित असलेल्या काही जणांच्या भुवया उंचावल्या. राज्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे देखील मंत्री आहेत. मात्र त्यांचा उल्लेख चक्क मुख्यमंत्री म्हणून केल्यामुळे अनेकांचा काही काळ गोंधळ उडाला. दरम्यान, बोलण्याच्या ओघात अजित पवारांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून केला असावा, असाही तर्क काढला जातो आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे फारसे माध्यमांसमोर आलेले नाहीत. एका ठिकाणी बोलताना आदित्य ठाकरे यांनी आपल्यावरील भार हलका केला असल्याचंही विधान केलं होतं. अशातच आता अजित पवारांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव यांच्याऐवजी आदित्य यांचं नाव घेतल्यानं चर्चांना उधाण आलं नसतं, तरच नवल!

संबंधित बातम्या :

पंतप्रधानांच्या बैठकीला उद्धव ठाकरेंची दांडी, राज्यात मोठी चर्चा, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

PDCC Bank Chairman : अजित पवार यांचं धक्कातंत्र, पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्षपदी सुनील चांदेरेंची वर्णी

दादा मला वाचवा, बघतोय रिक्षावाला संघटनेचं अनोखं आंदोलन; अजित पवार यांच्याकडे विशेष मागणी

पाहा व्हिडीओ –

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.