AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘परमेश्वराने मला दूरदृष्टी दिली आणि मी भाजपमध्ये आलो’, खासदार सुजय विखे-पाटलांची काँग्रेसवर टोलेबाजी

'मी परमेश्वराचे आभार मानतो की मला दूरदृष्टी दिली आणि मी भाजपमध्ये आलो. काँग्रेसची ही अवस्था होणार हे माहित असल्यानं मी भाजपमध्ये आलो', असं वक्तव्य सुजय विखे-पाटील यांनी केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसवर जोरदार टोलेबाजीही केलीय. केंद्र सरकारच्या वयोश्री योजनेतून गरजूंना साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

'परमेश्वराने मला दूरदृष्टी दिली आणि मी भाजपमध्ये आलो', खासदार सुजय विखे-पाटलांची काँग्रेसवर टोलेबाजी
सुजय विखे पाटील यांचा काँग्रेसवर निशाणाImage Credit source: TV9
| Edited By: sagar joshi | Updated on: Mar 12, 2022 | 6:20 PM
Share

अहमदनगर : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) काँग्रेसचा सुपडा साफ झालाय. पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेसचा आम आदमी पक्षाने (Aam Admi Party) धुव्वा उडवला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी मिश्किल टिप्पणी करत काँग्रेसवर जोरदार टीका केलीय. ‘मी परमेश्वराचे आभार मानतो की मला दूरदृष्टी दिली आणि मी भाजपमध्ये आलो. काँग्रेसची ही अवस्था होणार हे माहित असल्यानं मी भाजपमध्ये आलो’, असं वक्तव्य सुजय विखे-पाटील यांनी केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसवर जोरदार टोलेबाजीही केलीय. केंद्र सरकारच्या वयोश्री योजनेतून गरजूंना साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale), आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजपचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष लाचार बनलाय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या न बोलावलेल्या लग्नात काँग्रेस वराती म्हणून सहभागी होत आहे. काँग्रेसनं आता 40 चे शून्य होण्याची वाट पाहावी आणि नवी सुरुवात करावी, असा जोरदार टोला सुजय विखे-पाटील यांनी काँग्रेसला लगावलाय. त्याचबरोबर शिवसेनेची स्पर्धा ही नोटाबरोबर असल्याचं गोवा आणि उत्तर प्रदेशात पाहायला मिळालं. ते नोटालाही मागे टाकू शकले नाहीत. जे प्रभारी राज्यात रोज बोलतात त्यांना पाहून गोव्याच्या जनतेनं त्यांना नाकारलं असल्याची खोचक टीका सुजय विखे यांनी शिवसेनेवर केलीय.

‘बोलघेवड्या माणसांना पुढं करुन पक्षाची अधोगती सुरु’

राधाकृष्ण विखे पाटील यांनीही शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. शिवसेनेची मंडळी आता करमणुकीचं साधन बनली आहेत. गोव्यात तुम्हाला नोटापेक्षाही कमी मतं मिळाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. बोलघेवड्या माणसांना पुढं करुन पक्षाची अधोगती होईल. भविश्यात शिवसेनेला कुणीही गांभीर्यानं घेणार नाही, अशी जोरदार टीका विखे-पाटील यांनी केलीय.

तर अदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना विकण्याचा महसूल विभागाचा एकमेव धंदा बनलाय. बिल्डरांना जागा विकल्या जात आहेत. सरकारने कारवाई केली नाही तर कोर्टात जाणार, असा इशाराही राधाकृष्ण विखे यांनी दिलाय. तसंच राज्यात वाळू माफियांचा धुमाकूळ सुरु आहे. सत्तेतील पक्ष स्वत:चं भलं करण्याच्या मागे लागले आहेत. राज्यातील जनतेशी त्यांना काही देणंघेणं नाही, अशी जोरदार टीका विखे-पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलीय.

भाजपला आव्हान दिलं तर सुपडा साफ होईल- आठवले

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवलाय. भाजपला आव्हान दिलं तर सुपडा साफ होईल. अजूनही वेळ गेलेली नाही. चार राज्यातील जनतेनं भाजपच्या बाजुने कौल दिलाय. 2024 ला महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार आहे. शिवसेनेनं अजूनही भाजपसोबत यावं, असा सल्लाही आठवले यांनी दिलाय. तर काँग्रेसची अवस्था अतिशय वाईट बनली आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढेल असं दिसत नाही. पक्षांतर्गत वाद सुरु आहेत. गांधी परिवाराचं आकर्षण आता संपलंय. काँग्रेसनं गांधी परिवार सोडण्याची गरज असल्याचा सल्लाही आठवले यांनी काँग्रेसला दिलाय.

इतर बातम्या :

अधीर रंजन चौधरी म्हणाले ममता बॅनर्जी ‘पागल’! देशभरात काँग्रेसचे 700 आमदार असल्याचंही आवर्जून सांगितलं

धनंजय मुंडे म्हणतात कोण निलेश राणे? पवारांवरील आरोपानंतर राष्ट्रवादी आक्रमक

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली