AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मिर्चीची सवय लागली असेल तर सामान्यांच्या कराच्या पैशाची चहा गोड कशी लागणार?’, अतुल लोंढेंचा फडणवीसांचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर टेरर फंडिंगचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे मलिक यांच्या अडचणीही वाढताना दिसत आहेत. अशावेळी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही एका इंग्रजी वेबसाईटचा हवाला देत भाजपवर आरोप केलाय. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला आहे.

'मिर्चीची सवय लागली असेल तर सामान्यांच्या कराच्या पैशाची चहा गोड कशी लागणार?', अतुल लोंढेंचा फडणवीसांचा टोला
अतुल लोंढे, देवेंद्र फडणवीसImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 02, 2022 | 5:05 PM
Share

मुंबई : राज्यात सध्या सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप नेत्यांमध्ये जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. सध्या टेरर फंडिंगचा (Terror Funding) मुद्दाही चांगलाच गाजतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर टेरर फंडिंगचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे मलिक यांच्या अडचणीही वाढताना दिसत आहेत. अशावेळी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनीही एका इंग्रजी वेबसाईटचा हवाला देत भाजपवर आरोप केलाय. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला आहे.

‘प्रिय देवेंद्रजी, इक्बाल मिर्ची या मुंबई बाँब स्फोटातील अतिरेक्याशी संबंधित कंपन्यांकडून भाजपाला आलेल्या या डोनेशनबाबत आपण काही बोलणार आहात का? मिर्ची ची सवय लागली असेल तर सामान्य जनतेच्या कराच्या पैशाची चहा तुम्हाला गोड कशी लागेल?’ असा खोचक सवाल अतुल लोंढे यांनी फडणवीसांना विचारलाय.

नेमका प्रकार काय?

भारतीय जनता पार्टीने एका अशा कंपनीकडून मोठं डोनेशन घेतलं आहे, ज्या कंपनीची चौकशी सध्या अंमलबजावणी संचलनालयाकडून केली जातेय. या कंपनीशी दाऊद इब्राहिमचा सहकारी इक्बाल मेमन उर्फ इक्बाल मिर्चीचा संबंध होता असं वृत्त ‘द वायर’ने दिलं आहे. या वृत्ताचा धागा पकडत अतुल लोंढे यांनी भाजपला खोचक टोला लगवालाय.

फडणवीसांचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल

दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपची भूमिका आणि रोख स्पष्ट केला आहे. दाऊद इब्राहिम, अंडरवर्ल्डशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांना वाचवायला अख्खे सरकार उभे आहे. देशात असे कधी घडले नाही. ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे आहेत, ते मुंबईच्या खून्यांशी व्यवहार करणाऱ्या सोबत राहतात, हेही पाहतो आहोत. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होणारच. देशद्रोह्यांशी संबंध हा सर्वात मोठा गुन्हा आहे. त्यामुळे नवाब मलिक यांचा बचाव करताना नाही जनाची तर किमान मनाची तरी… नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नसतील, तर मग हेच म्हणावे लागेल की हे दाऊद इब्राहिमला समर्पित सरकार आहे. पण आम्हाला चर्चेत रस, अनेक मुद्दे मांडणार, चर्चा सुद्धा करणार, असं फडणवीस म्हणाले.

इतर बातम्या :

हे तर बेवड्यांना समर्पित सरकार, त्यांना शेतकरी नव्हे दारू उत्पादन करणारा जवळचा वाटतो- फडणवीसांचा घणाघात

कितीही गोंधळ घाला, नवाब मलिकांचा राजीनामा नाही म्हणजे नाहीच; जयंत पाटलांनी अधिवेशनापूर्वीच ठणकावले

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.