AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर मी माझा राजीनामा चंद्रकांत पाटलांकडे देईन : जितेंद्र आव्हाड

तर मी माझा राजीनामा चंद्रकांत पाटील यांच्या हातात देईन" असे जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad on ashish shelar) म्हणाले.

...तर मी माझा राजीनामा चंद्रकांत पाटलांकडे देईन : जितेंद्र आव्हाड
| Updated on: Nov 30, 2019 | 4:12 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथविधीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली होती. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं (Jitendra awhad on ashish shelar) आहे. “मुख्यमंत्र्यांविरोधात जर तुम्ही सुप्रीम कोर्टात गेला जर याच्यावर एकाही कोर्टाने वेडावाकडा निकाल दिला. तर मी माझा राजीनामा चंद्रकांत पाटील यांच्या हातात देईन” असे जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad on ashish shelar) म्हणाले.

“तुम्हाला रात्री 1.30 वाजता कॅबिनेट चालते, सकाळी पहाटे 4 वाजता राष्ट्रपती राजवट उठवलेली चालते. 6.30 ला शपथ चालते. तुम्हाला ज्या सुप्रीम कोर्टात जा, जर याच्यावर एकाही कोर्टाने वेडावाकडा निकाल दिला. तर माझा राजीनामा मी चंद्रकांत पाटीलांच्या हातात देईन. त्यांनी जाऊन राज्यपाल आणि अध्यक्षांना द्यावा. जर असं झालं नाही तर त्यांनी द्यावा” असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“मुख्यमंत्री दोन्ही सभागृहाचे सदस्य नाहीत ते मुख्यमंत्री कसे होतात असे चंद्रकांत पाटील म्हणतात. त्यांना मला विचाराव वाटत की ते संविधान वाचतात की नाही. संविधानाची एक प्रत भेट देऊ का?” असा प्रश्नही त्यांनी विचारला.

“मुख्यमंत्र्यांची आशा ठेवून काम करणारे, सतत देवेंद्र फडणवीसांना पाण्यात पाहणारे, एवढं ज्ञान, व्हा रे व्हा,” अशी खोचक टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी (Jitendra awhad on ashish shelar) केली.

इतकंच नव्हे तर भाजप नेते आशिष शेलार यांच्या ट्विटलाही जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. “आशिष शेलार यांना कवी म्हणून ठेऊ. त्यांना पुढील पाच वर्षे कवी व्हायचं आहे. शब्द ओढून ताणून काय तरी शब्द जुळवायचे आणि कवी व्हायचं, चांगल आहे. पुढील पाच वर्षे कवीच व्हायचं त्यांना दुसरं काम त्यांना काय आहे.”

“आम्हीही पाच वर्षे सत्तेच्या बाहेर गेलो. सत्तेच्या बाहेर येणं जाणे हे लोकशाही आणि संविधानामुळे जनतेचा अधिकार आहे. तुम्हाला 122 वरुन 105 वर आणलं. तेव्हाच तुम्ही समजायला हवं होतं की जनतेच्या मनात काय आहे. आता ज्या पद्धतीने तुम्ही गेले 15 दिवस वागलात अजून जनतेच्या डोळ्यातून मनातून उतरलात.” असेही जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad on ashish shelar) म्हणाले.

“चंद्रकांत पाटील यांना सुप्रीम कोर्टात नाही. तर इंटरनॅशनल हेगच्या कोर्टात जाऊ द्या. जर त्यांना 180 दिवस मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहू शकतात हा निकाल दिला नाही. तर मी काहीही हरेन. त्यांच्या मंत्रिमंडळात सावंत नावाचे मंत्री होते. ते दोन्ही सभागृहाचे सदस्य होते का? याची आठवणही चंद्रकांत पाटील यांना करुन द्या” असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.