AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena : कोर्टाच्या निर्णयाने लोकशाहीचा विजय, उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना काय आहे सांगणे?

न्यायदेवताच्या निर्णयामुळे लोकशाहीचा विजय झाला आहे. आजच्या निर्णयामुळे न्यायदेवतेवरील विश्वास सार्थ ठरला आहे. आता सुप्रीम कोर्टाचा निकालही लोकशाहीचे भवितव्य ठरणारा असणार आहे.

Shivsena : कोर्टाच्या निर्णयाने लोकशाहीचा विजय, उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना काय आहे सांगणे?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
| Updated on: Sep 23, 2022 | 9:39 PM
Share

मुंबई : उच्च न्यायालयाच्या (High Court) निकालानंतर शिवसैनिकांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. तीन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर पक्षाला आणि नेतृ्त्वाला दिलासा देणारी बाब घडली आहे. कारण शिवतीर्थावर दसरा मेळावा (Dussehra Rally) घेण्याचा शिवसेनेचा मार्ग खुला झाला असून आता खऱ्या अर्थाने तयारी सुरु झाली आहे. उच्च न्यायालयाने कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी ही सरकारकडे दिली असली तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांना एक अवाहन केले आहे. दसरा मेळावा ही शिवसेनेची गेल्या 66 वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे या तेजस्वी उत्सवाला गालबोट लागू नये असे अवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. शिवाय विजय सत्याचाच म्हणत आगामी काळातही सर्वकाही सुरळीत होईल असा विश्वास त्यांनी दिला आहे.

शिवसेनेच्या परंपरेला अडथळा निर्माण व्हावा यासाठी अनेकजण कामाला लागले होते. त्यामुळे राज्यात अस्थिरतेचे वातावरणही झाले होते. पण अखेर सत्याचा विजय हा होणारच. त्यामुळेच न्यायादेवतेच्या निकालामुळे शिवसेनेची परंपरा अखंडित राहणार आहे.

न्यायालयाने परवानगी दिली असली तरी हा सोहळा शांततेत पार पडवा यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे पक्षप्रमुख म्हणाले आहेत. कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी जेवढी सरकारची आहे तेवढीच शिवसैनिकांची असेही पक्षप्रमुखांनी सांगितले आहे.

अनेक अडचणींवर मात करुन यंदाचा मेळावा पार पडणार आहे. त्यामुळे राज्यभरातून शिवसैनिक हे शिवतीर्थाकडे येतील. त्यामुळे उत्साहाच्या गुलालाची उधळण असू द्या पण त्यामुळे अनुचित प्रकार घडणार नाही याची देखील काळजी घ्यावी लागणार आहे.

न्यायदेवताच्या निर्णयामुळे लोकशाहीचा विजय झाला आहे. आजच्या निर्णयामुळे न्यायदेवतेवरील विश्वास सार्थ ठरला आहे. आता सुप्रीम कोर्टाचा निकालही लोकशाहीचे भवितव्य ठरणारा असणार आहे. त्यावर आताच काही सांगता येणार नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

निकालानंतर आपल्याला पहिला दसरा मेळावाही आठवत असल्याचे सांगितले. कोरोनाकाळात खंड पडला पण आता कधीही यामध्ये खंड पडणार नसल्याचे सांगत आगामी काळातही ही परंपरा कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आता कोर्टाच्या निर्णयानंतर मेळावा यशस्वीरित्या पार पाडणे ही जबाबदारी राहणार आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.