AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेनाभवनावर शिवरायांचा फोटो खाली, बाळासाहेबांचा वर का? शिवसेना नाव काढून ‘ठाकरे सेना’ करा : उदयनराजे

शिवसेना पक्षाला नाव देताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना विचारायला आला होतात का? असा सवाल करत उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर थेट हल्लाबोल चढवला

सेनाभवनावर शिवरायांचा फोटो खाली, बाळासाहेबांचा वर का? शिवसेना नाव काढून 'ठाकरे सेना' करा : उदयनराजे
| Updated on: Jan 14, 2020 | 1:11 PM
Share

पुणे : शिवसेना या नावाला कधी आम्ही हरकत घेतली नाही, पण आता शिवसेना नाव काढून टाका आणि ठाकरे सेना करा, असं चॅलेंज माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेला दिलं आहे. दादरमधील शिवसेनाभवनावर शिवरायांचा फोटो खाली आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वर का? असा सवालही उदयनराजेंनी (Udayanraje on Shivsena) केला.

शिवसेना पक्षाला नाव देताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना विचारायला आला होतात का? असा सवाल करत उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर थेट हल्लाबोल चढवला. ‘घड्याळ’वाल्यांची वेळ आता संपत आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव ‘जाणता राजा’ होते, अशा शब्दात त्यांनी शरद पवारांवरही अप्रत्यक्ष तोफ डागली.

शिवसेना नाव काढून टाका आणि ठाकरे सेना करा, काय प्रॉब्लेम आहे, सरकार तर तुमचं आहे. मला पण बघायचं आहे, नाव बदलल्यावर किती तरुण तुमच्या सोबत राहतात, असं खुलं आवाहन उदयनराजेंनी केलं.

देशभरात वादंग माजलेल्या जय भगवान गोयल यांच्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन उदयनराजे भोसले यांनी हल्लाबोल केला. यावेळी उदयनराजेंनी गोयल यांच्यावर हल्ला चढवलाच, पण शरद पवार, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही नाव न घेता हल्लाबोल केला.

जाणता राजा फक्त छत्रपती शिवराय, उदयनराजेंचा हल्लाबोल, पवार, ठाकरेंवर घणाघात

या जगात जाणता राजा फक्त छत्रपती शिवराय होते. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. तसंच शिवसेना भवनावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो खाली का? असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला.

“लोकांनी बुद्धी गहाण ठेवली का ते कळत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांशी कुणाची तुलना होऊ शकत नाही. छत्रपती शिवरायांच्या जवळही जाण्याची कोणाची लायकी नाही”, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

शिवाजी महाराजांकडे महाराष्ट्राच नव्हे जगातील आदर्श व्यक्ती म्हणून पाहिलं जातं, शिवरायांची तुलना अनेकवेळा झाली. लोकांनी बुद्धी गहाण ठेवलीय का माहित नाही, काल-परवाचं पुस्तक पाहून वाईट वाटलं. गोयल नावाच्या लेखकाने मोदींची तुलना छत्रपती शिवरायांशी केली, महाराष्ट्रात जाऊ द्या, जगात शिवरायांशी कोणाची तुलना होऊ शकत नाही, असंही उदयनराजे म्हणाले.

शिवाजी महाराजांचं आत्मचरित्र वाचतो, त्यानंतर त्यांच्यासारखं वागायचा प्रयत्न करतो, म्हणून आपण शिवाजी महाराज होऊ शकत नाही. काही गळ्यात बिनपट्टे असणारे लोक लुडबुड करतात. त्यांचं नाव घेऊन मला त्यांना मोठं करायचं नाही, असंही उदयनराजे पुढे म्हणाले.

आम्ही महाराजांचे वंशज म्हणून कधी नावाचा दुरुपयोग केला नाही. राजेशाही संपल्यावर आम्ही लोकशाही मान्य केली. सर्वधर्मसमभाव ही कल्पना कुठं गेली? जो बिनपट्ट्याचा रस्त्यावर फिरतोय त्याने त्याची लायकी दाखवून द्यावी, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला गेला.

महाशिवआघाडीतलं ‘शिव’ का काढलं? वडापावला ‘शिव’वडा नाव देता. सोयीप्रमाणे भूमिका घेता. प्रकाश गजभिये हा थर्डक्लास आमदार आहे. महाराजांच्या वेशात मुजरा करतो, अशी टीकाही उदयनराजेंनी (Udayanraje on Shivsena) केली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.