AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena : अपयश राज्य सरकाराचे अन् आरोप दुसऱ्यावरच, वेदांता प्रकल्पावर काय म्हणाले माजी मुख्यमंत्री?

राज्यातील राजकीय घडामोडीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विभागप्रमुखांच्या बैठका घेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पक्ष संघटनेवर त्यांनी भर दिला आहे.

Shivsena : अपयश राज्य सरकाराचे अन् आरोप दुसऱ्यावरच, वेदांता प्रकल्पावर काय म्हणाले माजी मुख्यमंत्री?
वेदांता प्रकल्पावरुन उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
| Updated on: Sep 18, 2022 | 12:50 PM
Share

मुंबई : (Vedanta Project) वेदांता प्रकल्प गुजरातला नेमका गेला कुणामुळे..? यावरुन गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी याबाबत सांगितले असले तरी दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री राहिलेले (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांचे काय म्हणणे आहे हे देखील तेवढेच महत्वाचे होते. अखेर आरोप-प्रत्यारोप होत असतानाचा उद्धव ठाकरे यांनी वेदांताबाबत नेमके काय झाले हे सांगितले. वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात सुरु व्हावा यासाठी प्रयत्न केले. शिवाय त्यादृष्टीने हालचालीही सुरु झाल्या मात्र, आपले अपयश उघडे पडू नये म्हणून राज्य सरकारकडून (MVA) मविआ वर आरोप केले जात असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे वेदांता गुजरातला गेला ही चूक कोणाची हे अद्यापही गुलदस्त्यामध्येच आहे.

राज्यातील राजकीय घडामोडीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विभागप्रमुखांच्या बैठका घेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पक्ष संघटनेवर त्यांनी भर दिला आहे. तर आता ठाकरे कुटुंबियांची चौथी पिढीही राजकारणात येत असल्याचे ते म्हणाले आहेत.

शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार आहे. त्यामुळे या मेळाव्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आतापासून नियोजन करणे गरजेचे आहे. आपल्या विभागातून अधिकाअधिक नागरिक मेळाव्यासाठी येतील असे नियोजन करावे अशा सूचनाही पक्षप्रमुखांनी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.