Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anurag Thakur : नव्या राजकीय मित्राबाबत काय म्हणाले केंद्रीय मंत्री, निशाणा मात्र जुन्या मित्रावर..!

मुंबई महापालिकेवर गेल्या 25 वर्षापासून शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे. आगामी निवडणूकांमध्ये डबल इंजिन असलेल्या सरकारला साथ देण्याचे आवाहन ठाकूर यांनी मुंबईकरांना केले आहे.

Anurag Thakur : नव्या राजकीय मित्राबाबत काय म्हणाले केंद्रीय मंत्री, निशाणा मात्र जुन्या मित्रावर..!
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
Follow us
| Updated on: Sep 18, 2022 | 12:54 PM

मुंबई : राजकारणात कोणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो हे राज्यातील घडामोडीने स्पष्ट झालेच आहे. तरी (Politics) राजकारणातली मैत्री म्हटले की, समोर येते ती  (Shiv sena- BJP Party ) शिवसेना-भाजपाची युती. 25 वर्षाच्या युतीला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. तर दुसरीकडे नवा मित्र म्हणून भाजपाच्या जोडीला शिंदे गट गेला आहे. राजकारणातील या मैत्रीबाबत काय वाटते असा सवाल (Anurag Thakur) केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी दिलेल्या उत्तरातून अनेक अर्थ निघू शकतात. मित्राला मित्रापासून घाबरण्याची गरज नाही असे म्हणत शिंदे गटाला जवळ केले तर जुना मित्र राहिलेल्या शिवसेनेला अधिक अंतर दिले आहे. हा शब्दांचा खेळ असला तरी ठाकूर यांचा निशाणा शिवसेनेवर होता हे आता काही लपून राहिलेले नाही.

‘मिशन लोकसभा’ च्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे कल्याण लोकसभा मतदार संघात होते. कल्याण मतदारसंघाचा दौरा आटोपून ते मुंबईतील सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आले होते. ठाकूर यांच्यावक कल्याण लोकसभा मतदार संघाची जबाबदारी होती. पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांनी अंबरनाथ येथे रॅलीही काढली होती.

इंदू मिलमध्ये सुरु असलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीला उशिर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. याला उत्तर देताना त्यांनी मोदी सरकारचे योगदान निदर्शनास आणून दिले आहे. स्मारकाचे जे काही काम होत आहे ते मोदी सरकारनेच केले असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नाहीतर 14 एप्रिलला सुट्टीचा निर्णय देखील मोदी सरकारच्या काळात झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

कल्याण आणि ठाणे मतदार संघात शिंदे गटाचे खासदार असले तरी भाजपाने या मतदार संघात तयारी सुरु केली आहे. मात्र, आम्ही एकच असल्याचे म्हणत ठाकूर यांनी त्या प्रश्नावर सावरासावर केली. तर खा. श्रीकांत शिंदे यांना तर आपण भेटलो आहोतच पण राहुल शेवाळे यांना देखील भेटणार असल्याचे ते म्हणाले आहेत. आम्ही सोबत येऊन जनतेची कामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मुंबई महापालिकेवर गेल्या 25 वर्षापासून शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे. आगामी निवडणूकांमध्ये डबल इंजिन असलेल्या सरकारला साथ देण्याचे आवाहन ठाकूर यांनी मुंबईकरांना केले आहे. त्यामुळे मिशन लोकसभा बरोबरच ठाकूर यांनी मुंबई महापालिकेसाठीही दौरा असल्याचे दाखवून दिले आहे.

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.