AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक संपली, आता VVPAT चिट्ठ्यांचं पुढे काय होणार?

नवी दिल्ली : यावर्षीची लोकसभा निवडणूक अनेक कारणांनी वेगळी आणि विशेष ठरली. त्यातील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देशभरात पहिल्यांदाच EVM सोबत वापरण्यात आलेले VVPAT मशीन. EVM मधील मतदानाची तपासणी करता यावी आणि मतदारांना आपले मत योग्य उमेदवारालाच जात आहे ना हे तपासण्याची सोय म्हणून या निवडणुकीत VVPAT मशीन वापरण्यात आले. लोकसभा निवडणूक संपली आणि आता नव्या […]

निवडणूक संपली, आता VVPAT चिट्ठ्यांचं पुढे काय होणार?
| Updated on: May 28, 2019 | 3:13 PM
Share

वी दिल्ली : यावर्षीची लोकसभा निवडणूक अनेक कारणांनी वेगळी आणि विशेष ठरली. त्यातील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देशभरात पहिल्यांदाच EVM सोबत वापरण्यात आलेले VVPAT मशीन. EVM मधील मतदानाची तपासणी करता यावी आणि मतदारांना आपले मत योग्य उमेदवारालाच जात आहे ना हे तपासण्याची सोय म्हणून या निवडणुकीत VVPAT मशीन वापरण्यात आले. लोकसभा निवडणूक संपली आणि आता नव्या सरकारच्या शपथविधीचा दिवसही ठरला. मग आता निवडणूक मतदानातील VVPAT चिट्ठ्यांचं पुढे काय होणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात पडला असणार. या चिट्ठ्या रद्दीत जाणार की यांना सुरक्षित ठेवण्यासाठी काही विशेष उपाययोजना केली जाणार याचेही उत्तरे समजून घ्यायला अनेकांना आवडेल.

एका VVPAT मशीमध्ये जवळजवळ 1400 चिट्ठ्या असतात. केवळ दिल्लीचे उदाहरण घेतले, तर तेथे मतदानादरम्यान 13 हजार 819 VVPAT मशीन वापरण्यात आले होते. मतमोजणी आणि निकालानंतर आता या चिट्ठ्यां पुन्हा VVPAT मध्ये सील करुन ठेवण्यात आल्या आहेत. VVPAT सोबत EVM देखील सील करण्यात आले. मतमोजणी होऊन निकाल घोषित झाल्यानंतर या सर्व EVM आणि VVPAT मशीनला 45 दिवसांसाठी सुरक्षित ठेवले जाते.

VVPAT मधील चिट्ठ्यांवरील शाई उडून जाऊ नये म्हणून हे सर्व मशीन पूर्ण अंधार आहे अशाच जागी ठेवण्यात येईल. मशीन हवा आणि प्रकाश यांच्या संपर्कात येऊ नये म्हणून प्रत्येक मशीन काळ्या पॉलिथीन बॅगमध्ये सील करण्यात आले आहे.

जर कुणाला निवडणुकीबद्दल कोणताही आक्षेप असेल तर त्या व्यक्तीला निकालापासून 45 दिवसांच्या आत याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते. न्यायालयाच्या आदेशानुसारच संबंधित मशीन पुन्हा तपासले जाते किंवा सुरक्षित ठेवले जाते.

जर कोणताही आक्षेप नोंदवला गेला नाही किंवा उच्च न्यायालयाकडून EVM च्या तपासणीचे कोणतेही आदेश नसतील, तर अशावेळी ही मशीन्स पुढील निवडणुकीसाठी तयार करण्याचे काम सुरु केले जाते. पुढील निवडणुकीसाठी EVM तयार करताना प्रत्येक EVM ची बॅटरी बदलली जाते. मतदानादरम्यान EVM मध्ये कोणताही फेरफार होऊ नये म्हणून ते पूर्णपणे सील केले जाते. त्यामुळे जर तिच बॅटरी वापरली तर मशीन मतदान सुरु असतानाच बंद पडण्याचा धोका असतो. म्हणून कोणत्याही नव्या निवडणुकीसाठी EVM तयार करताना सर्वात आधी त्याची बॅटरी बदलली जाते. दुसरीकडे VVPAT ची बॅटरी मतदान सुरु असतानाही बदलता येण्याची सोय उपलब्ध आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.