AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते ‘या’ 4 ठिकाणी पैसे गुंतवा, पैशाची कमतरता कधीही भासणार नाही

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्राची रचना केली होती. चाणक्यांनी या धोरणात जीवनाशी संबंधित जवळपास सर्व पैलूंचे ज्ञान दिले आहे. तर जाणून घ्या आचार्यांच्या मते, व्यक्तीने कोणत्या ठिकाणी पैसे खर्च करणे कधीही टाळू नये.

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते 'या' 4 ठिकाणी पैसे गुंतवा, पैशाची कमतरता कधीही भासणार नाही
Acharya chanakya
| Updated on: Feb 13, 2022 | 7:59 AM
Share

मुंबईआचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी स्वतः त्यांच्या जीवनात अनेक समस्यांचा सामना केला होता, परंतु तरीही त्यांनी त्यांच्या धोरणांमध्ये अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे ज्या प्रत्येकाने आपल्या जीवनात (Life) आणल्या पाहिजेत. ते एक महान मुत्सद्दी, राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ होते. आचार्यांनी आपल्या नीतिशास्त्रात (Chankaya Niti) सांगितले आहे की, काही ठिकाणी आपण पैसे खर्च करायला हवेत जेणे करुन त्याचा फायदा आपल्याला भविष्यात होईल. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या जागा.

आजारी लोकांना मदत करा आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीमध्ये सांगितले आहे की, आजारी लोकांना त्यांच्या क्षमतेनुसार पैशाच्या बाबतीत शक्य तितकी मदत केली पाहिजे. यामुळे तुमचा मान-सन्मान नेहमीच वाढतो.यासोबतच देवही तुमच्यावर प्रसन्न होतो.

गरीब आणि गरजूंना मदत करा कोणत्याही गरीब आणि गरजू व्यक्तीला मदत केल्याने पुष्कळ पुण्य प्राप्त होते. या कारणास्तव, गरजेच्या वेळी गरजूंसाठी पैसे खर्च करण्यात कधीही संकोच नसावा. यामध्ये गरीब मुलांना शिक्षण देण्यासाठी तुम्हीही देणगी देऊ शकता. यामुळे तुमच्या आयुष्यात कधी पैशाची कमतरता भासणार नाही.

सामाजिक कार्यात पैसा गुंतवावा चाणक्याच्या धोरणानुसार, प्रत्येकाने आपल्या उत्पन्नाचा काही भाग अर्थात एकूण उत्पन्न सामाजिक कार्यात नक्कीच गुंतवले पाहिजे. तुम्ही हॉस्पिटल आणि शाळेतही पैसे गुंतवू शकता. यामुळेन तुमची प्रतिष्ठा वाढते आणि तुमची मदतही कोणत्याही गरजूला पोहोचते.

धार्मिक स्थळांना दान करा चाणक्य नीतीमध्ये असे नमूद केले आहे की कोणत्याही धार्मिक स्थळासाठी दान करण्यापासून कधीही मागे हटू नये, असे केल्याने पुण्य मिळते आणि जीवनात सकारात्मकता येते.

दानाचे महत्त्व सनातन परंपरेत अनेक प्रकारचे दान सांगितले गेले आहेत. ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीला योग्यता प्राप्त होते. दानामुळे केवळ ग्रहांचे दोषच दूर होत नाहीत तर जाणूनबुजून किंवा नकळत केलेल्या पापांपासून मुक्ती देखील मिळते. शास्त्रात सामान्य जीवनातल्या सर्व प्रकारच्या अडचणींवर विजय मिळवण्यासाठी दानाचा उपाय सांगण्यात आला आहे. ज्यामुळे चमत्कारिक फळांचे प्राप्ती होते.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

13 February 2022 Panchang | 13 फेब्रुवारी 2022, जाणून घ्या रविवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

नामस्मरण म्हणजेच सर्वस्व असे सांगणारे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

Lucky plants for Money : “वृक्षवल्ली आम्हा सोयरी” ही झाडं बनतील तुमच्या नशीबाची चावी, घरात ही झाडं नक्की लावा

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.