AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Garud Puran : गरूड पुराणातले हे मंत्र आहेत अत्यंत प्रभावी, नियमांचे पालन करून जाप केल्यास मिळतात चमत्कारिक फायदे

असे म्हणतात की गरूड पुराणाचे पठण केल्याने माणसाला अनेक ज्ञानाची माहिती मिळते, तसेच गरुड पुराणात जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या गोष्टींचे वर्णन केले आहे.

Garud Puran : गरूड पुराणातले हे मंत्र आहेत अत्यंत प्रभावी, नियमांचे पालन करून जाप केल्यास मिळतात चमत्कारिक फायदे
गरूड पुराणImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 19, 2023 | 2:08 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात 18 महापुराणांचा उल्लेख आहे. यापैकी एक गरुड महापुराण आहे. यामध्ये माणसाच्या यशस्वी आणि आनंदी आयुष्याची खोल रहस्ये सांगितली आहेत. असे म्हणतात की त्याचे पठण केल्याने माणसाला अनेक ज्ञानाची माहिती मिळते, तसेच गरुड पुराणात जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या गोष्टींचे वर्णन केले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गरुड पुराणात (Garud Purana) लोकांना साधे जीवन जगण्याचे सांगितले आहे. घरातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर 13 दिवस गरुड पुराणाचा पाठ केला जातो. यामुळे निवृत्त आत्म्याला शांती आणि सदगती प्राप्त होते.

गरुड पुराणात  कोणते मंत्र सांगितले आहेत?

ज्योतिषशास्त्रानुसार गरुड पुराणात असे काही मंत्र सांगण्यात आले आहेत, ज्याचा नियमित आणि नियमांनुसार जप केल्याने व्यक्तीला रोग, मृत्यूचे भय आणि आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळते. चला जाणून घेऊया या मंत्रांबद्दल.

गरिबी दूर करण्याचा मंत्र

जर तुम्ही पैशाशी संबंधित समस्यांमधून जात असाल आणि त्यातून सुटका हवी असेल तर गरुड पुराणात याशी संबंधित शास्त्र सांगण्यात आले आहे. असे म्हणतात की याच्या जपाने व्यक्तीची आर्थिक संकटातून लवकर सुटका होते आणि त्याच्या जिवनात सुख समृद्धी कायम राहते.

मंत्र- ज्योतिषशास्त्रानुसार ‘ओम जुनं सह’ मंत्राचा जप केल्याने लवकर लाभ होतो. यासोबतच श्री विष्णु सहस्त्रनामचा पाठ करण्याचा सल्ला देखील दिला जातो.असे सतत 6 महिने केल्यास धनाशी संबंधित समस्यांपासून लवकरच मुक्ती मिळते.

दीर्घायुष्य आणि निरोगी शरीरासाठी

भगवान विष्णूंनी सांगितलेल्या संजीवनी मंत्राचा उल्लेख गरुड पुराणातही आहे. असे म्हटले जाते की या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला निरोगी शरीर मिळते. व्यक्तीचे वय वाढते. सिद्ध झालेल्या व्यक्तीच्या संगतीतच हा मंत्र वापरावा, असे सांगितले जाते.

मंत्र- ‘यक्षी ओम ओम स्वाहा’ या मंत्राचा संपूर्ण नियमांसह जप करावा. असे म्हणतात की जर एखाद्याने नियम जाणून घेतल्याशिवाय जप केला तर त्याचे फळ मिळणार नाही.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.