Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आयुष्यामध्ये फक्त हे 3 मंत्र लक्षात ठेवा, तुमचा शत्रू देखील तुमच्यासमोर गुडघे टेकवेल!

ज्या लोकांच्या आयुष्यात (Life) मोठी ध्येय असतात, त्यांना मोठे ध्येय गाठायचे असते. ते शत्रूंना कधीच घाबरत नाहीत. विशेष म्हणून ते आपल्या शत्रूकडे कधी जास्त लक्ष देखील देत नाहीत. ते स्वत: चे काम जास्त चांगले करण्यावर भर देतात. जेणेकरून ते कोणत्याही परिस्थितीत शत्रूला खंबीरपणे तोंड देऊ शकतात.

Chanakya Niti : आयुष्यामध्ये फक्त हे 3 मंत्र लक्षात ठेवा, तुमचा शत्रू देखील तुमच्यासमोर गुडघे टेकवेल!
चाणाक्य नीती
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 3:18 PM

मुंबई : ज्या लोकांच्या आयुष्यात (Life) मोठी ध्येय असतात, त्यांना मोठे ध्येय गाठायचे असते. ते शत्रूंना कधीच घाबरत नाहीत. विशेष म्हणून ते आपल्या शत्रूकडे कधी जास्त लक्ष देखील देत नाहीत. ते स्वत: चे काम जास्त चांगले करण्यावर भर देतात. जेणेकरून ते कोणत्याही परिस्थितीत शत्रूला खंबीरपणे तोंड देऊ शकतात. खरे तर तुमचे शत्रूच तुम्हाला सतत मेहनत करत राहण्याची आणि पुढे जात राहण्याची प्रेरणा देतात. म्हणूनच, जर तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करायचे असेल आणि शत्रूवर विजय मिळवायचा असेल तर आचार्य चाणक्यांच्या (Acharya Chanakya) तीन गोष्टी नेहमीच लक्षात ठेवा.

आपल्या शत्रूला कधीच हलक्यात घेऊ नका

चाणक्याच्या मते, शत्रूला कधीही हलक्यात घेऊ नका. तुमच्याशी स्पर्धा करण्याची ताकद त्याच्यात आहे, त्यामुळे नक्कीच त्याने त्यासाठी तयारीही केली असेल. जर तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्याला किंवा शत्रूला कमी लेखण्याची चूक केलीत, तर तुम्ही नक्कीच कोणत्या ना कोणत्या वेळी पराभूत व्हाल. पण जर तुम्ही त्याला तुमच्यापेक्षा शक्तीशाली मानून तयारी केली तर नक्कीच विजय तुमचाच होईल.

रागावर नियंत्रण ठेवा नाहीतर नुकसान होईल

राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे असे चाणक्य मानत होते. रागाच्या भरात एखादी व्यक्ती अनेकदा काही ना काही चूक करते. कधी कधी शत्रू मुद्दाम रागात आणण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांच्या बोलण्यात अडकलात तर ती संधी पाहून तुमच्यावर वर्चस्व निर्माण करतील. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवायला शिका आणि कोणताही निर्णय शांत मनाने घ्या.

ध्येयाकडे सतत वाटचाल करत राहा

चाणक्य म्हणतात की, जर तुमचे ध्येय मोठे असेल तर त्यासाठी तुम्हाला खूप वेळ द्यावा लागेल. यासाठी तुम्हाला खूप संयम हवा. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत संयम सोडू नका. जीवनात अनेक वेळा पराभवाला सामोरे जावे लागते, अशा वेळी संयमाने समजून घेतले पाहिजे. त्यामुळे धीराने परिस्थितीचे आकलन करा, स्वतःला तयार करा आणि ध्येयाकडे सतत वाटचाल करत राहा.

संबंधित बातम्या : 

अपयश पाचवीला पुजले आहे? कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाहीये मग हे ज्योतिष उपाय नक्की फाॅलो करा!

Shattila Ekadashi 2022 Date | जाणून घ्या, षटिला एकादशी म्हणजे नक्की काय ? मुहूर्त आणि व्रताची पद्धत

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं
IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं.
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध.
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान.
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला.
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास.
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.