Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Plants Vastu Rules | घरात झाडं लावताय ? मग या गोष्टी लक्षात ठेवा

हिंदू परंपरेत (Hindu Mythology) झाडे आणि वनस्पतींची देवदेवतांप्रमाणे पूजा करून त्यांची सेवा करण्याची मान्यता आहे.झाडे आणि वनस्पतींचे (Plant and Tree Rules) हे महत्त्व लक्षात घेऊन वास्तुशास्त्रात त्यांच्याशी संबंधित महत्त्वाचे वास्तु नियमही सांगण्यात आले आहेत.

Plants Vastu Rules | घरात झाडं लावताय ? मग या गोष्टी लक्षात ठेवा
plants vastu rules
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 9:48 AM

मुंबई :  हिंदू परंपरेत (Hindu Mythology) झाडे आणि वनस्पतींची देवदेवतांप्रमाणे पूजा करून त्यांची सेवा करण्याची मान्यता आहे. हिंदू धर्मग्रंथांमध्ये झाडे आणि वनस्पतींचे महत्त्व सांगताना असे म्हटले आहे की जो व्यक्ती एक पिंपळ, एक कडुलिंब, काथा, बेल, करवंद, आंबा आणि चिंचेची झाडे लावतो, त्या व्यक्तीला आयुष्यात कोणत्याच गोष्टींची कमी भासत नाही. पण घरात झाडे लावताना काही नियम लक्षात ठेवणे गरजेचे असते. झाडे आणि वनस्पतींचे (Plant and Tree Rules) हे महत्त्व लक्षात घेऊन वास्तुशास्त्रात त्यांच्याशी संबंधित महत्त्वाचे वास्तु नियमही सांगण्यात आले आहेत. जर आपण हे नियम पाळले तर आपल्या आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू शकत नाही. चला तर मग जाणून घेऊयात झाडं संबंधी वास्तू नियम (Rules in Marathi).

झाडं संबंधी वास्तू नियम

वास्तूनुसार घराच्या आत उत्तर किंवा पूर्व दिशेला लहान शोभेची झाडे लावावीत. जर तुम्हाला तुमच्या घरात फ्लॉवर गार्डन बनवायचे असेल तर नेहमी पूर्व, पूर्व-उत्तर म्हणजेच ईशान्य किंवा पश्चिम दिशा निवडा.

जर तुम्हाला तुमची फुलांची बाग ईशान्य कोपऱ्यात बनवायची असेल तर तुम्ही हलकी फुलांची झाडे किंवा तुळशी, आवळा इत्यादी वेली लावू शकता.

वास्तूशास्त्रानुसार उत्तर आणि पूर्व दिशेला आंब्याचे झाड, दक्षिण आणि आग्नेय कोनाच्या मध्यभागी जामुनचे झाड, घराबाहेर आग्नेय दिशेने डाळिंबाचे झाड लावणे शुभ मानले जाते.

तसेच चिंचेचे झाड आग्नेय दिशेला लावावे, बेलचे झाड घराच्या पश्चिम दिशेला लावावे. वास्तूच्या पिंपळाचे झाड घराच्या पश्चिम दिशेला लावणे खूप शुभ मानले जाते.

वास्तूशास्त्रानुसार, जर तुम्ही कोणत्याही इच्छेने एखादे शुभ रोप लावत असाल तर नेहमी शुभ काळ, शुभ तिथी आणि शुभ नक्षत्राची पूर्ण काळजी घ्यावी. शुक्ल पक्ष अष्टमी ते कृष्ण पक्ष सप्तमी हा काळ वृक्ष लागवडीसाठी शुभ मानला जातो.

वास्तूशास्त्रानुसार पूर्वेला कोणतेही शुभ वृक्ष तुमच्या इमारतीपासून इतक्या अंतरावर लावा की, सकाळी ११ वाजेपर्यंत त्याची सावली तुमच्या घरावर पडणार नाही.

वास्तूनुसार, जर तुमच्या घरावर निष्फळ वनस्पतीची सावली पडली तर त्याच्या वास्तू दोषांमुळे तुम्हाला अनेकदा कोणत्या ना कोणत्या समस्या किंवा रोगाचा सामना करावा लागतो.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधीत बातम्या :

Lohri 2022 | लोहरी सण कधी आहे? जाणून घ्या त्याचे महत्त्व आणि आख्यायिका

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते आयुष्यात या 4 प्रकारच्या लोकांकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका, नुकसान नक्की होईल

Best Worship Tips | अशक्य गोष्टी ही शक्य होतील, निर्मळ मनाने प्रार्थना करा, पूजा करताना ‘या’ 10 गोष्टी लक्षात ठेवा

ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं...
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं....