AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahakumbh 2025: आधी राम मंदिर प्राणप्रतिष्ठेस विरोध, आता महाकुंभाबाबत शंकराचार्यांचा मोठा दावा

mahakumbh 2025: स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, महाकुंभ पोर्णिमेच्या दिवशी संपला. त्यानंतर जे सुरु होते, ते सरकारी महाकुंभ होते. माघ महिन्यात कुंभ असतो. त्यामुळे माघ पोर्णिमेस कुंभ संपला. कुंभात असणारे कल्पवासी माघ महिन्यातील पोर्णिमेस परत गेले

Mahakumbh 2025: आधी राम मंदिर प्राणप्रतिष्ठेस विरोध, आता महाकुंभाबाबत शंकराचार्यांचा मोठा दावा
shankaracharya swami avimukteshwaranandImage Credit source: TV 9 Marathi
Follow us
| Updated on: Feb 28, 2025 | 1:34 PM

Shankaracharya Swami Avimukteshwaranand: प्रयागराजमध्ये सुरु समापन झालेल्या महाकुंभात 66 कोटी भाविकांनी संगमावर डुबकी लावली. हा जागतिक विक्रम झाला आहे. 45 दिवसांचा महाकुंभमेळा 13 जानेवारी रोजी सुरु झाला. त्याचा समारोप महाशिवरात्रीला 26 फेब्रुवारी रोजी झाली. परंतु यासंदर्भात जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी वेगळाच दावा केला आहे. महाकुंभ कधीच संपला होता, त्यानंतर जो राहिला तो सरकारी महाकुंभमेळा होता, असे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटले आहे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी आयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणेसही विरोध केला होता. मंदिर अपूर्ण असल्याचे सांगत प्राणप्रतिष्ठा होऊ शकत नसल्याचे त्यांनी म्हटले होते.

काय म्हणतात जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद

स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, महाकुंभ पोर्णिमेच्या दिवशी संपला. त्यानंतर जे सुरु होते, ते सरकारी महाकुंभ होते. माघ महिन्यात कुंभ असतो. त्यामुळे माघ पोर्णिमेस कुंभ संपला. कुंभात असणारे कल्पवासी माघ महिन्यातील पोर्णिमेस परत गेले. त्यानंतर जे सुरु होते ते सरकारी आयोजन होते. त्याला अध्यात्मिक महत्व नाही. तो एखादा पारंपरिक मेळा होता, असे शंकराचार्यांनी म्हटले.

गो हत्येसंदर्भात भूमिका स्पष्ट करा

यावेळी जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी 17 मार्च ही गोहत्येविरोधातील आंदोलनाची तारीख जाहीर केली आहे. ते म्हणाले, ‘आम्ही सर्व राजकीय पक्षांना एकत्र येऊन गोहत्या थांबवायची की सुरू ठेवायची हे सांगण्यास सांगितले आहे. कारण स्वातंत्र्यापासून त्यावर चर्चा सुरु आहे. राजकीय पक्षांनी 17 मार्चपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करावी.

हे सुद्धा वाचा

66.30 कोटी भाविकांचे गंगा स्नान

45 दिवस चाललेला महाकुंभाचा समारोप झाला आहे. 13 जानेवारीपासून सुरू झालेल्या या महाकुंभात 66.30 कोटी भाविकांनी गंगा आणि संगमात स्नान केले. प्रशासनाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी रात्री 8 वाजेपर्यंत 1.53 कोटींहून अधिक भाविकांनी गंगा आणि संगमात स्नान केले. भाविकांची ही संख्या चीन आणि भारत वगळता अमेरिका, रशिया आणि युरोपीय देशांसह सर्व देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. तसेच, मक्का आणि व्हॅटिकन सिटीला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या संख्येपेक्षा ही संख्या अधिक आहे.

हम अल्लाह के, कसम खाते है की... अल कायदाकडून भारताला टोकाची धमकी
हम अल्लाह के, कसम खाते है की... अल कायदाकडून भारताला टोकाची धमकी.
Rain Update आजही मुंबईकरांची तारांबळ उडणार? हवामान खात्याचा अंदाज काय?
Rain Update आजही मुंबईकरांची तारांबळ उडणार? हवामान खात्याचा अंदाज काय?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाक पुन्हा हादरला, लाहोरमध्ये स्फोटाचे आवाज; घडल काय
ऑपरेशन सिंदूरनंतर पाक पुन्हा हादरला, लाहोरमध्ये स्फोटाचे आवाज; घडल काय.
अब पाकिस्तान का जवाब... घुसून मारल्यानंतर बिलावल भुट्टोचा तिळपापड
अब पाकिस्तान का जवाब... घुसून मारल्यानंतर बिलावल भुट्टोचा तिळपापड.
हा होता पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार, नाव-फोटो समोर, बघा कोणाशी कनेक्शन?
हा होता पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार, नाव-फोटो समोर, बघा कोणाशी कनेक्शन?.
भारताने मोठी चूक केली, प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा बदला... पाककडून धमकी
भारताने मोठी चूक केली, प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा बदला... पाककडून धमकी.
सदावर्ते राज ठाकरेंवर भडकले, पाकिस्तानी खाज, मुझे ये नही बोलना की...
सदावर्ते राज ठाकरेंवर भडकले, पाकिस्तानी खाज, मुझे ये नही बोलना की....
OperationSindoor:एअर स्ट्राईकची कहाणी जगाला सांगणाऱ्या त्या दोघी कोण?
OperationSindoor:एअर स्ट्राईकची कहाणी जगाला सांगणाऱ्या त्या दोघी कोण?.
ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकची मस्ती जिरेना... पंतप्रधानांचा कांगावा सुरूच
ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकची मस्ती जिरेना... पंतप्रधानांचा कांगावा सुरूच.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.