Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mangalsutra: सौभाग्याचं लेणं असलेल्या मंगळसूत्राचे आहेत आरोग्यदायी फायदे

दोन सोन्याच्या वाट्या आणि काळ्या मण्यांनी बनवलेल्या मंगळसूत्राचे अनेक महत्त्व आहे. सोन्याचे दोन वाट्या सत्वगुणांशी  संबंधित आहेत, जे शिव आणि शक्तीचे प्रतीक दर्शवते. हृदययाच्या संबंधित समस्या दूर ठेवण्यासाठी देखील हे लाभदायक मानल्या जाते.

Mangalsutra: सौभाग्याचं लेणं असलेल्या मंगळसूत्राचे आहेत आरोग्यदायी फायदे
मंगळसूत्र Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 8:38 AM

मंगळसुत्रला (Mangalsutra) भारतीय संस्कृतीत सौभाग्याचं लेणं मानल्या जातं. प्राचीन काळापासून स्त्रियांच्या या दागिन्याला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार मंगळसूत्र घालण्याचा संबंध थेट पतीच्या दीर्घायुष्याशी जोडल्या गेला आहे. असे मानले जाते की मंगळसूत्र पतीचे आयुष्य वाढवते. ते धारण केल्याने पती-पत्नीमध्ये प्रेम आणि बांधिलकी टिकून राहते. त्यामुळे लग्नात मुलींना मंगळसूत्र घातले जाते. मंगळसूत्राला संस्कृतमध्ये ‘मांगल्यतंतू’ असेही म्हणतात. यात दोन पदरी दो-यात काळे मणी गुंफलेले असतात. मध्यभागी 4 छोटे मणी व 2 लहान वाट्या असतात. एक पती, दुसरी पत्नीकडील. दोन दोरे म्हणजे पती-पत्नीचे बंधन. 4 काळे मणी म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ. आजकाल मंगळसूत्राच्या रचनेत अनेक बदल पाहायला मिळत आहेत, पण आजही खरे मंगळसूत्र हे काळे मणी आणि दोन वाट्याचे डिझाइन असलेले मानले जाते. दक्षिण भारतात आजही फक्त दोन वाट्यांच्या डिझाइनची मंगळसूत्रेच घातली जातात, पण तेथे काळ्या मण्यांऐवजी पिवळा धागा वापरण्याची पद्धत आहे.

मंगळसूत्राची आरोग्यदायी फायदे

दोन सोन्याच्या वाट्या आणि काळ्या मण्यांनी बनवलेल्या मंगळसूत्राचे अनेक महत्त्व आहे. सोन्याचे दोन वाट्या सत्वगुणांशी  संबंधित आहेत, जे शिव आणि शक्तीचे प्रतीक दर्शवते. हृदययाच्या संबंधित समस्या दूर ठेवण्यासाठी देखील हे लाभदायक मानल्या जाते. शक्यतो या वाट्यांवर कुठल्याही प्रकारचे डिझाईन नसावे. यासोबतच  काळे मोती वाईट नजर आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण करतात असे मानले जाते.  शास्त्रानुसार मंगळसूत्रांमुळे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरातील  रक्तदाब  नियंत्रणात ठेवते. याच कारणामुळे ते छातीजवळ घातल्या जाते.  यासोबतच मंगळसूत्रातील तीन गाठी वैवाहिक जीवनातील तीन मुख्य गोष्टी दर्शवतात. प्रथम, गाठ एकमेकांबद्दल आदर, दुसरी पालकांबद्दलचे प्रेम आणि तिसरी गाठ देवाबद्दल आदर ठेवण्याची आठवण करून देते.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.