AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्य देवाचा जन्म कसा झाला?, जाणून घ्या पौराणिक कथा

हिंदू धर्मात पंचदेवांपैकी एक सूर्य देव मानले जातात (Surya Dev Birth Story). ज्योतिष शास्त्रातही सूर्याचं मोठं महत्त्व आहे.

सूर्य देवाचा जन्म कसा झाला?, जाणून घ्या पौराणिक कथा
surya dev
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 10:49 AM

मुंबई : हिंदू धर्मात पंचदेवांपैकी एक सूर्य देव मानले जातात (Surya Dev Birth Story). ज्योतिष शास्त्रातही सूर्याचं मोठं महत्त्व आहे. ज्योतिषनुसार सूर्याला ग्रहांचा राजा मानलं जातं. हा मनुष्याच्या जीवनात मान-सन्मान, पिता-पुत्र आणि यशकारक मानला जातो. ज्योतिषनुसार सूर्य दर महिन्यात एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या प्रकारे बारा राशींमध्ये सूर्य एक वर्षात आपलं चक्र पूर्ण करतो (Surya Dev Birth Story Know The Pouranik Katha).

सूर्याला आरोग्य देवता मानलं जाते. सूर्य प्रकाशानेच पृथ्वीवर जीवन शक्य आहे. सूर्याला प्रतिदिन जल अर्पण केल्याने भक्ताला आध्यात्मिक लाभ प्राप्त होतो. सोबतच आरोग्य लाभही प्राप्त होतो. पण, काय तुम्हाला माहिती आहे का सूर्य देवाचा जन्म कसा झाला होता. जाणून घ्या सूर्य देवाच्या जन्माची पौराणिक कथा…

सूर्य देवाच्या जन्माची पौराणिक कथा –

पौराणिक कथेनुसार, पहिले हे संपूर्ण जग प्रकाशरहित होतं. त्यावेळी कमलयोनी ब्रह्माजी प्रकट झाले. त्यांच्या मुखातून प्रथम शब्द ॐ निघाला जो सूर्याच्या तेज रुपी सूक्ष्म रुप होता. त्यानंतर ब्रह्माजींच्या चार मुखातून चार वेद प्रकट झाले जे ॐ च्या तेजात एकाकार झालेत.

ही वैदिक तेजचं आदित्य आहे जो विश्वाच्या अविनाशाचं कारण आहे. हा वेद स्वरुप सूर्यच सृष्टीच्या उत्पत्ती, पालन आणि संहारचं कारण आहे. ब्रह्माजींच्या प्रार्थनेने सूर्याने आपल्या महातेजाला अकत्र करुन स्वल्प तेजाला धारण केलं.

सृष्टीच्या रचनेवेळी ब्रह्माजींचे पुत्र मरीची झाले ज्यांचे पुत्र ऋषी कश्यप यांचा विवाह अदितिसोबत झाला. अदितिने घोर तपस्या करुन भगवान सूर्याला प्रसन्न केलं. ज्यांनी तिच्या ईच्छापूर्तीसाठी सुषुम्ना नावाची किरणेच्या रुपात त्यांच्या गर्भात प्रवेश केला. गर्भावस्थातही अदिति चान्द्रायण सारखे कठीण व्रतांचं पालन करत होत्या.

तेव्हा ऋषी राज कश्यप यांनी क्रोधित होऊन अदितिला म्हटलं की, ‘तू याप्रकारे उपवास ठेवून गर्भस्थ बाळाचा जीव का घेतेय’ (Surya Dev Birth Story Know The Pouranik Katha)

हे ऐकून देवी अदितिने गर्भातील बालकाला आपल्या उदरातून बाहेर काढलं जो आपल्या अत्यंत दिव्य तेजाने प्रज्वलीत होत होता. भगवान सूर्य बाळाच्या स्वरुपात त्या गर्भातून प्रकट झाले. अदितिला मारिचम-अन्डम म्हटलं जाण्याचं कारण म्हणजे हे बालक मार्तंड नावाने प्रसिद्ध झाला. ब्रह्मपुराणमध्ये अदितिच्या गर्भातून जन्मलेल्या सूर्याच्या अंशाला विवस्वान म्हटलं गेलं.

Surya Dev Birth Story Know The Pouranik Katha

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Somvati Amavasya 2021 | सोमवती अमावस्या कधी, जाणून घ्या महत्त्व आणि शुभ मुहूर्त…

‘हे’ संकेत दिसले तर समजा तुमच्यावर शनिचा प्रकोप, ‘या’ उपायांनी होणार बचाव…

भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा वियोग का झाला होता? जाणून घ्या देवी लक्ष्मीच्या स्वयंवराची अनोखी कहाणी

पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO.
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती.
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?.
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा....
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.