AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाकुंभचा निरोप घेताना हा विधी करतात, नागा साधूंचा त्यानंतर परतीचा प्रवास होतो सुरु

'अमृत स्नान' केल्यानंतर एक हजार अश्वलमेथ यज्ञाच्या बरोबरीचे पुण्य मिळते अशी मान्यता आहे. महाकुंभमध्ये अमृत स्नान केल्यानंतर साधू आणि संत ध्यानस्थ होतात. शेवटचे अमृत स्नान झाल्यानंतर सर्व साधू आपआपल्या आखाड्यांकडे परण्याचा प्रवास सुरु करतात, नेमके काय करतात नागा साधू पाहा...

महाकुंभचा निरोप घेताना हा विधी करतात, नागा साधूंचा त्यानंतर परतीचा प्रवास होतो सुरु
| Updated on: Feb 08, 2025 | 4:54 PM
Share

संगम नगरी प्रयागराज येथील अमृत स्नान आटोपल्यानंतर सर्व आखाड्यातील नागा साधूंनी महाकुंभातून निरोप घ्यायला सुरुवात केली आहे. आता केवळ सात आखाड्यातील नागा साधू शिल्लक राहीले आहेत. ते देखील १२ फेब्रुवारीला काशीसाठी रवाना होतील. परंतू महाकुंभला निरोप देण्यापूर्वी नागा साधू एक विधी करतात. या महाकुंभात आलेल्या नागासाधूंचा नंतर परतीचा प्रवास सुरु होतो. त्याआधी काही धार्मिक अनुष्ठान देखील नागा साधू करतात…

शेवटचा कुंभ कधी

शुक्रवारी महाकुंभचा २७ वा दिवस आहे. अजून १९ दिवसांचा कार्यक्रम शिल्लक आहे. २६ फेब्रुवारी रोजी शेवटचा दिवस आहे. नागा साधूंचे तिन्ही स्नान संपले आहेत. त्यानंतर त्याची वापसी होणार आहे. गुरुवारीच अनेक आखाड्यांचे साधू निघाले. काही आखाड्यांचे साधू १२ फेब्रुवारी रोजी निरोप घेणार आहेत. तर काही आखाड्यांचे साधू वसंत पंचमीच्या स्नानानंतर निरोप घेतील. सात आखाड्यांचे साधू थेट आता काशी विश्वनाथला जातील. आधी प्रयागराज येथे सर्व नागासाधू निघण्यापूर्वी कढी – पकोडे यांचे भोजन ते करतात. आणि दुसरे म्हणजे शिबिरात लावलेली धर्म ध्वजाची रस्सी ढीली करतात. असे म्हटले जाते की ही त्यांची शतकाहून जुनी परंवरा आहे. नागा साधू यांच्या मते महाकुंभातून निरोप घेताना हा विधी केल्यानंतर त्यांचा परतीचा प्रवास सुरु होतो. त्यापैकी काही जण गुरुंकडे जातात, काही जण हिमालयात तपश्चर्या करायला रवाना होतात.

काशी विश्वनाथला जाणार नागा साधू

महाशिवरात्रीच्या निमित्ताने सात आखाड्यांचे नागा साधू वाराणशीच्या काशी विश्वनाथला रवाना होतील, तेथे २६ तारखेच्या महाशिवरात्रपर्यंत आपला डेरा टाकतील त्यानंतर ते आपआपल्या आखाड्यात रवाना होतील. महाशिवरात्रीच्या निमित्ताने वाराणसीत नागांची मिरवणूक निघेल. त्यानंतर मसान होळी साजरी केली जाईल आणि त्यानंतर गंगास्नान केले जाईल. ही तिन्ही कामं झाल्यानंतर ते माघारी फिरतील…

तिन्ही शाही स्नान सपंताच पुढचा प्रवास

साधूंसाठी अमृत स्नानाचे महत्व खूप आहे. अशी मान्यता आहे की अमृत स्नान केल्यानंतर एक हजार अश्वलमेथ यज्ञाच्या बरोबरीचे पुण्य मिळते. महाकुंभमध्ये अमृत स्नान केल्यानंतर साधू संत ध्यानस्थ होतात. शेवटचे अमृत स्नान झाल्यानंतर सर्व साधू आपआपल्या आखाड्यांकडे परण्याचा प्रवास सुरु करतीत..

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.