AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips | आजारांना घरापासून दूर ठेवायचं असेल तर घरात ‘हे’ उपाय करा

उन्हाळा आपल्याबरोबर अनेक प्रकारचे रोग घेऊन येतो (Vastu Tips Upay). सध्या कोरोना आणि व्हायरल फिवरचाही प्रादुर्भाव आहे. अशा परिस्थितीत आपल्याला आजूबाजूला आजारी लोक भेटतील.

Vastu Tips | आजारांना घरापासून दूर ठेवायचं असेल तर घरात 'हे' उपाय करा
Vastu Tips
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 3:18 PM

मुंबई : उन्हाळा आपल्याबरोबर अनेक प्रकारचे रोग घेऊन येतो (Vastu Tips Upay). सध्या कोरोना आणि व्हायरल फिवरचाही प्रादुर्भाव आहे. अशा परिस्थितीत आपल्याला आजूबाजूला आजारी लोक भेटतील. बर्‍याच वेळा या आजारांचे कारण आपल्या काही चुका असतात, ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि त्या चुका घरातल्या आजारांचे प्रवेशद्वार बनतात. अशा उपायांबद्दल येथे जाणून घ्या ज्यामुळे रोगांना आपल्या घरात प्रवेश करु मिळणार नाही (Vastu Tips Upay For Protecting Home From Illness).

1. बर्‍याच वेळा वास्तुदोष देखील घरात रोगांचे कारण बनतात. ज्याबद्दल आपल्याला माहिती नसते. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की घराचा मुख्य दरवाजा कधीही तुटलेला नसावा. मुख्य प्रवेशद्वार तुटल्याने नकारात्मकता घरात प्रवेश करते आणि केवळ रोगच नव्हे तर इतर संकटेदेखील कुटुंबावर येतात.

2. मुख्य प्रवेशद्वारावर स्वच्छतेचीही विशेष काळजी घ्या. बरेच लोक घर स्वच्छ करतात, परंतु मुख्य प्रवेश द्वारावर दररोज साफसफाई करत नाहीत. आपली ही चूक घरातल्या आजारांना कारणीभूत ठरु शकते. याचा घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

3. घरात जाळे असणे हे देखील चांगले मानले जात नाही. यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होते. म्हणूनच, घरामध्ये स्वच्छता ठेवा, जेणेकरुन घरात जाळे होणार नाही. याशिवाय, घरात काटेरी झाडे लावू नका.

4. सकाळी पूजा झाल्यानंतर घराच्या मुख्य प्रवेश द्वारावर दररोज स्वस्तिक बनवा. हनुमान चालीसा नियमितपणे वाचा. यातून अनेक प्रकारच्या संकटांवर मात केली जाते.

5. घराचा मध्यभाग नेहमी रिकामा ठेवा आणि प्रवेशद्वारावर वाजणाऱ्या घंटी लाला. यामुळे घराचे वातावरण आनंददायी राहील. घराच्या खोल्यांमध्ये खिडक्या बसवा जेणेकरुन प्रकाश येत राहील. गडद ठिकाणी अधिक नकारात्मकता असते.

6. झोपताना डोके नेहमी पूर्वेकडे किंवा दक्षिणेकडे ठेवा. पश्चिम किंवा उत्तरेकडे डोकं करुन झोपू नका.

7. घराच्या दक्षिण दिशेने हनुमानजी यांचे चित्र लावा. जर आपण आयुष्यातील समस्या संपत नसतील तर आपण नऊ दिवस घरात अखंड रामायण पाठ करा.

8. गरजूंना सामर्थ्यानुसार दक्षिणा द्या. शास्त्रवचनांमध्ये उत्पन्नातील काही भाग दान करण्याचा उल्लेखही आहे. असे केल्याने घरातील सर्व समस्या दूर होतात आणि आनंद येतो.

9. शनिवारी आपल्या क्षमतेनुसार काळा कपडा, काळी डाळ, काळी तीळ, मोहरीचे तेल इत्यादी दान करा. पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. हनुमानजींना सिंदूरचा चोला अर्पण करा आणि रोग आणि इतर संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करा.

10. सकाळी आणि संध्याकाळी घरात कपूर आणि लवंग तुप टाकून जाळा. यामुळे घराची नकारात्मकता दूर होते.

Vastu Tips Upay For Protecting Home From Illness

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

सतयुगातील कन्येचा द्वापारयुगातील श्रीकृष्णाचा भाऊ बलदाऊशी विवाह, जाणून घ्या ही पौराणिक कथा

Vastu Tips Health | सततचं आजारपण दूर करायचं असेल, तर या टिप्स ट्राय करा, समस्या होईल दूर

Vastu Tips Sindoor : त्रस्त आहात, सन्मान मिळत नाहीये, पैसै नाहीत; मग कुंकू ठरेल उपयोगी; ‘हे’ एकदा कराच

Vastu Tips | पूजा स्थानावर ‘या’ वस्तू ठेवा, देवी लक्ष्मीची कृपा राहील, आर्थिक समस्या सुटतील

ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग.
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?.
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात.
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल.
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा.