AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लहान मुलांना का लावला जातो काळा टिका? असे आहे कारण

सनातन धर्मातील बहुतेक श्रद्धांमागे वैज्ञानिक तथ्ये सांगितली आहेत. वैज्ञानिक तथ्यांनुसार, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मानवी शरीरात असतात परंतु जेव्हा मुलांचा विचार केला जातो तेव्हा..

लहान मुलांना का लावला जातो काळा टिका? असे आहे कारण
काळा टिकाImage Credit source: Social Media
| Updated on: May 06, 2023 | 10:20 AM
Share

मुंबई : अनेकदा तुम्ही पाहिले असेल की लहान मुलांना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी त्यांना काळ्या रंगाचा टिका (Kala Tika) लावला जातो. इतकेच नाही तर  मुलांच्या पायाला काळा दोराही बांधला जातो. धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने मुलावर वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही आणि नकारात्मक ऊर्जा मुलापासून दूर राहते. असं म्हणतात की मुलं नाजुक असतात त्यामुळे त्यांना लवकर दृष्ट लागते. काळा टिका लावण्यामागील इतर मान्यता काय आहे ते जाणून घेऊया.

काळा टिका का लावावा

सनातन धर्मातील बहुतेक श्रद्धांमागे वैज्ञानिक तथ्ये सांगितली आहेत. वैज्ञानिक तथ्यांनुसार, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मानवी शरीरात असतात परंतु जेव्हा मुलांचा विचार केला जातो तेव्हा त्यांच्यामध्ये या रेडिएशनची कमतरता असते. अशा परिस्थितीत जेव्हा एखाद्या व्यक्तीची वाईट नजर मुलांवर पडते तेव्हा मुलांमध्ये असलेल्या या रेडिएशनचा वाईट परिणाम होतो. यानंतर मुलांची तब्येत बिघडायला लागते आणि काही वेळा त्यांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणूनच असे म्हणतात की जेव्हा काळा टिका किंवा काळा धागा मुलाला बांधला जातो तेव्हा या रेडिएशनचा प्रभाव कमी होते आणि मुलांच्या आरोग्याला फारसा फरक पडत नाही.

अशी आहे धार्मिक भावना

असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पाहते तेव्हा त्याच्या मनात दोन प्रकारचे विचार येतात, एक सकारात्मक आणि दुसरा नकारात्मक. एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीकडे नकारात्मक विचाराने पाहिले तर समोरच्या व्यक्तीभोवती नकारात्मक ऊर्जा संचारू लागते. या उर्जेच्या प्रभावामुळे आरोग्यासंबंधी किंवा आर्थिक विकारांसंबंधी अनेक समस्या उद्भवतात, परंतु जेव्हा तुम्ही किंवा तुमची मुले काळा टिळा लावतात किंवा काळा धागा बांधतात तेव्हा ही नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि त्याचा प्रभावापासून त्यांचा बचाव होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.