AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाचा स्टार खेळाडू क्रिकेट विश्वाला अलविदा करण्याच्या तयारीत?

टीम इंडियाने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 2013 मध्ये चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती. तेव्हा हा क्रिकेटर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीत प्लेअर ऑफ द सीरिज ठरला होता. मात्र आता या खेळाडूला सातत्याने धावांसाठी संघर्ष करावा लागतोय.

टीम इंडियाचा स्टार खेळाडू क्रिकेट विश्वाला अलविदा करण्याच्या तयारीत?
| Updated on: Jan 14, 2023 | 8:55 PM
Share

मुंबई : बीसीसीआयच्या निवड समितीने शुक्रवारी न्यूझीलंड विरुद्धच्या आगामी वनडे आणि टी 20 मालिकेसाठी शुक्रवारी रात्री भारतीय संघ जाहीर केला. निवड समितीने या दोन्ही मालिकेसाठी 2 कर्णधारांची निवड केली आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं एकदिवसीय मालिकेत नेतृत्व करणार आहे. तर हार्दिक पांड्या टी 20 मालिकेत टीम इंडियाच्या कॅप्टन्सीची जबाबदारी पाहणार आहे. निवड समितीने अनेक वर्षांनी पृथ्वी शॉ याचा समावेश करण्यात आला. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाला आयसीसी ट्रॉफी जिंकून देणाऱ्या खेळाडूला डच्चू देण्यात आला आहे.

टीम इंडियाचा स्टार ओपनर आणि कॅप्टन्सी सांभाळलेल्या ‘गब्बर’ शिखर धवनचा न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी निवड करणयात आली नाही. धवन सातत्याने धावांसाठी संघर्ष करतोय. शिखरला नुकतंच नोव्हेंबर 2022 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या वनडे सीरिजसाठी कर्णधारपद देण्यात आलं होतं. मात्र तेव्हापासून शिखर टीममधून बाहेर आहे.

शिखरचा श्रीलंका विरुद्धच्या टी 20 आणि वनडे सीरिजमध्येही समावेश करण्यात आला नव्हता. शिखर बांगलादेश दौऱ्यातही अपयशी ठरला होता. तेव्हा शिखरने 3 सामन्यांच्या वनडे सीरिजमध्ये अनुक्रमे 3, 8 आणि 7 अशा एकूण 18 धावाच केल्या. शिखरला गेल्या 5 डावांमध्ये फक्त 49 धावाच करता आल्या आहेत.

टीम इंडियाने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 2013 मध्ये चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती. शिखर धवन या आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीत प्लेअर ऑफ द सीरिज ठरला होता. तेव्हा बर्मिंगघममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 5 धावांनी पराभव केला होता. धवनने तेव्हा रोहित शर्मासोबत ओपनिंग करताना एकूण 24 बॉलमध्ये 2 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 31 धावांचं योगदान दिलं होतं. धवनने या संपूर्ण स्पर्धेत 363 धावा केल्या होत्या. त्यामुळे धवन ‘प्लेअर ऑफ द सीरिज’ ठरला होता.

शिखर धवनने टीम इंडियासाठी कसोटी, वनडे आणि टी 20 अशा तिन्ही फॉर्मेटमध्ये 10 हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. शिखरने 34 कसोटी सामन्यांमध्ये 2 हजार 315 धावा, 167 वनडेत 6 हजार 793 रन्स आणि 68 टी 20 मध्ये एकूण 1 हजार 759 धावा केल्या आहेत. या व्यतिरिक्त शिखरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 8 हजा 499 रन्स केल्या आहेत.

न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक.

न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया

हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड़, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ आणि मुकेश कुमार.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.