AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajinkya Rahane | विराट आणि अजिंक्यमध्ये कॅप्टन्सीसाठी टक्कर? काय म्हणतो अजिंक्य !

रहाणेने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत 2-1 ने ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

Ajinkya Rahane | विराट आणि अजिंक्यमध्ये कॅप्टन्सीसाठी टक्कर? काय म्हणतो अजिंक्य !
विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे
| Updated on: Jan 24, 2021 | 8:21 PM
Share

मुंबई : “कसोटीमधील नेतृत्वासाठी माझ्यात आणि विराट कोहलीमध्ये (Virat Kohli) कोणतीच स्पर्धा नाही. विराटचा नेहमीच टीम इंडियाला (Team India) विजय मिळवून देण्याचा उद्देश असतो. जेव्हा माझ्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली तेव्हा विराट कर्णधार म्हणून कामगिरी करतो, तशीच कामगिरी आपण करावी, असाच माझाही उद्देश होता. कर्णधार कोणीही असो, भारताला विजयी करावं हीच आमच्या दोघांची इच्छा असते”, अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचा हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) दिली.तो एका विशेष कार्यक्रमात सहभागी झाला होता.यावेळेस त्याने याबाबत प्रतिक्रिया दिली. (Clash for captaincy between Virat and Ajinkya What does rahane say)

रहाणेने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत 2-1 ने ऐतिहासिक विजय मिळवून दिला. तेव्हापासून विराटला वगळून रहाणेला कर्णधार करा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. अजिंक्यने या मुलाखती दरम्यान अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.

“पंतला खेळण्याचं स्वातंत्र्य दिलं”

“तु कसलाही विचार करु नकोस. तणावमुक्त होऊन इतर वेळेस जसा मुक्तपणे खेळतोस तसाच खेळ, असा सल्ला मी रिषभ पंतला (Rishabh Pant) दिला होता” , असं रहाणे म्हणाला. पंतने ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या सामन्यातील दुसऱ्या डावात निर्णायक कामगिरी केली. त्याने नाबाद 89 धावांची खेळी केली. या जोरावर टीम इंडियाने सामन्यासह मालिका जिंकली. पंतच्या या खेळीचं कौतुक करण्यात आलं.

“पुजारा हिंमतवान”

रहाणेने टीम इंडियाचा संकटमोचक चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याच्या  झुंजार अर्धशतकी खेळीचं कौतुक केलं. “पुजाराने सिडनी आणि ब्रिस्बेन कसोटीमध्ये निर्णायक भूमिका बजावली. त्याने अनेक चेंडूंचा सामना केला. पुजाराने मैदानात घट्ट पाय रोवून टीम इंडियाची एक बाजू लावून धरली. यामुळे शुबमन गिल (Subhaman Gill) आणि रिषभ पंतला झाला”, असं रहाणेने स्पष्ट केलं. म्हणाला.

संबंधित बातम्या :

Special Story | कसोटी कर्णधार म्हणून योग्य कोण, अजिंक्य की विराट? पाहा दोघांची आकडेवारी

ब्रिस्बेनपासून चंदनापुरीपर्यंत रहाणेंचाच गुलाल, कसोटी मालिका जिंकली, ग्रामपंचायत निवडणुकीतही रहाणे पॅनेल विजयी!

(Clash for captaincy between Virat and Ajinkya What does rahane say)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.