AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिकेटपटूंना आता देशांतर्गत क्रिकेट खेळावंच लागणार! बीसीसीआयकडून फक्त तीन खेळाडूंना मिळाली सूट

आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय संघात खेळणारे खेळाडू देशांतर्गत क्रिकेटकडे कानाडोळा करत असल्याचं समोर आलं आहे. यासाठी बीसीसीआयने आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसत आहे. राष्ट्रीय संघातून फ्री असताना देशांतर्गत क्रिकेट खेळावं असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.

क्रिकेटपटूंना आता देशांतर्गत क्रिकेट खेळावंच लागणार! बीसीसीआयकडून फक्त तीन खेळाडूंना मिळाली सूट
Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 16, 2024 | 3:17 PM
Share

राष्ट्रीय संघात स्थान मिळाल्यानंतर अनेक जण देशांतर्गत क्रिकेटकडे पाठ फिरवत असल्याचं दिसून आलं आहे. गेल्या काही दिवसात बीसीसीआयने याकडे गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली आहे. इतकंच काय तर इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना दणका दिल्याचं पाहायला मिळाल. या वर्षाच्या सुरुवातील या दोन्ही खेळाडूंना सेंट्रल काँट्रॅक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवला होता. असं असताना बीसीसीआयने आता इतर खेळाडूंनाही स्पष्ट इशारा दिला आहे. राष्ट्रीय संघातून फ्री असाल तेव्हा देशांतर्गत क्रिकेट खेळावं लागेल. पण यातून काही खेळाडूंना वगळण्यात आलं आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सांगितलं आहे की, स्टार क्रिकेटपटूनी राष्ट्रीय संघात खेळत नसल्यास त्यांनी देशांर्गत क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज राहावं. असं असलं तरी यातून तीन खेळाडूंना मुभा दिली गेल्याचं सांगण्यात येत आहे. यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि वेगवान गोलंदाजी जसप्रीत बुमराह या खेळाडूंचा समावेश आहे. त्यांना स्वत:च खेळायचं की नाही हा निर्णय घ्यावा लागेल.

तीन खेळाडूंव्यतिरिक्त कसोटी खेळणाऱ्या इतर खेळाडूंनी दुलीप ट्रॉफी कमीत कमी एक किंवा दोन सामने खेळावे लागणार आहेत. दुलीप ट्रॉफीसाठी विभागीय निवड समितीऐवजी राष्ट्रीय निवड समितीच निवड करणार आहे. ऑगस्ट महिन्यात बांग्लादेश, तर सप्टेंबर महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका आहे. या दोन्ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. या दोन्ही मालिका भारतात होणार आहे. तर या वर्षाच्या शेवटी टीम इंडिया पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.

पीटीआयने बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार सांगितलं की, “यावेळेस दुलीप ट्रॉफीसाठी विभागीय निवड समिती नसेल. राष्ट्रीय निवड समिती या स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करणार आहे. या स्पर्धेसाठी कसोटी संघात दावा असणार्‍या खेळाडूंची निवड केली जाईल. फक्त रोहित, विराट आणि बुमराह आपल्या मर्जीने खेळायचं की नाही हा निर्णय घेतील. ” त्यामुळे जेव्हा राष्ट्रीय संघात निवड झाली नसेल तेव्हा देशांतर्गत क्रिकेटसाठी खेळाडूंना सज्ज व्हावं लागेल.

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.