AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा इफेक्ट! भारत-पाकिस्तान यांच्यातील पाच क्रिकेट सामने होणार रद्द

दहशतवादी देश अशी ओळख असलेल्या पाकिस्तानसोबत भारताने सर्वच संबंध तोडले आहेत. पाकिस्तानसोबत भारताने मागच्या 12-13 वर्षांपासून द्विपक्षीय मालिका खेळली नाही. आयसीसी स्पर्धेत फक्त दोन्ही देश आमनेसामने आले आहेत. पण पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हा विरोध आणखी तीव्र झाला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा इफेक्ट! भारत-पाकिस्तान यांच्यातील पाच क्रिकेट सामने होणार रद्द
भारत पाकिस्तान सामनाImage Credit source: PTI
| Updated on: Apr 25, 2025 | 7:37 PM
Share

पाकिस्तान हा देश कायम आपल्या कुरापती आणि दहशतवादी कृत्यांसाठी ओळखला जातो. आतापर्यंत पाकिस्तानने जे पेरलं आहे त्याचे परिणाम दिसत आहे. दहशतवाद्यांना आश्रयही पाकिस्तानात दिला जातो. याची अनेक उदाहरण भुतकाळात दिसून आली आहेत. ओसामा बिन लादेनलाही अमेरिकेने पाकिस्तानातच मारलं होतं. असं असताना पाकिस्तानकडून दहशतवादाला खिळ बसवण्याऐवजी अजून प्रोत्साहन देण्याचं काम केलं जात आहे. 22 एप्रिलला झालेल्या पहलगाम हल्ल्यातही पाकिस्तानचा हात आहे. या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांना जीव गमवावा लागला. या कृत्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तानविरुद्ध संताप आहे. पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवू नयेत अशी मागणी होत आहे. तसेच योग्य धडा शिकवावा अशी मागणीही जोर धरत आहे. दरम्यान बीसीसीआयने कठोर पावलं उचलावी अशी मागणी केली जात आहे. पाकिस्तानसोबत कोणत्याही स्पर्धेत खेळू नये. जर ही मागणी मान्य झाली तर एका वर्षात पाच सामने रद्द होऊ शकतात.

भारत आणि पाकिस्तान हे संघ आयसीसी आणि आशिया क्रिकेट काउंसिल स्पर्धेत एकमेकांचा सामना करतात. पण 22 एप्रिलला केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट बोर्डावर दबाव वाढला आहे. पाकिस्तानविरुद्ध आयसीसी स्पर्धेतही खेळू नये अशी मागणी जोर धरत आहे. बीसीसीआयने या प्रकरणी तसं कोणतीही पाऊल उचलेलं नाही. पण जर असं काही झालं तर एका वर्षात 5 सामन्यांवर गडांतर येणार आहे. यात आशिया कपपासून वर्ल्डकप आणि सिनियर टीमपासून ज्युनियर टीमचा समावेश असेल.

या वर्षी पुरुष आशिया कप खेळला जाणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद भारताकडे आहे. ही स्पर्धा पूर्णपणे भारतात खेळली जाईल. मागच्या काही आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक पाहीलं तर दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये असतात. तसेच सुपर 4 फेरीत पुन्हा आमनासामना होतो. यामुळे आशिया कप स्पर्धेतील दोन सामने रद्द होतील. या वर्षी महिला वनडे वर्ल्डकप भारतात होणार आहे. ही स्पर्धा राउंड रॉबिन फॉर्मेट खेळली जाईल. या स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना होईल. त्यामुळे रद्द होणाऱ्या यादीत आणखी एका सामन्याची भर पडेल.

पुरुषांचा 19 वर्षांखालील विश्वचषक पुढील वर्षी खेळवला जाणार आहे आणि यामध्येही भारत आणि पाकिस्तान असेल.पुढील वर्षी भारतात पुरुषांचा टी20 विश्वचषक होणार आहे. मागील टी20 विश्वचषकाप्रमाणे यावेळीही भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीसीसीआयने कठोर पाऊल उचललं तर हे पाच सामने एका वर्षात रद्द होतील.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.