AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya: हार्दिक पांड्याने टी-20 वर्ल्डकपमधील निवडीमागचं सत्य सांगितलं, निवड समिती अध्यक्षांची केली पोलखोल

मागच्यावर्षी दुखापतीमुळे हार्दिक पांड्याकडून अपेक्षित खेळ होऊ शकला नाही. सध्या हार्दिकला कोण पर्याय ठरु शकतं? त्याची चाचपणी सुरु आहे.

Hardik Pandya: हार्दिक पांड्याने टी-20 वर्ल्डकपमधील निवडीमागचं सत्य सांगितलं, निवड समिती अध्यक्षांची केली पोलखोल
Hardik Pandya
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 11:33 AM

मुंबई: भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या आपल्या फिटनेसवर मेहनत घेत आहे. अनेक वर्ष मुंबई इंडियन्सकडून खेळणारा हा प्रतिभावान खेळाडू आता IPL मधील नवीन फ्रेंचायजी अहमदाबादकडून खेळणार आहे. मागच्यावर्षी दुखापतीमुळे हार्दिक पांड्याकडून अपेक्षित खेळ होऊ शकला नाही. सध्या हार्दिकला कोण पर्याय ठरु शकतं? त्याची चाचपणी सुरु आहे. वेगवेगळ्या अष्टपैलू खेळाडूंना संघात संधी दिली जात आहे. मागच्यावर्षी टी-20 वर्ल्डकप स्पर्धा (ICC T20 World Cup) झाली. या स्पर्धेत हार्दिकला संघात (Indian Cricket Team) स्थान देण्याच्या निर्णयावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. बरीच टीकाही झाली होती. कारण संपूर्ण आयपीएलमध्ये हार्दिक दुखापतीमुळे गोलंदाजी करु शकला नव्हता. त्यावेळी जी टीका झाली, त्यावर हार्दिकने भाष्य केलं आहे. हार्दिकने त्याची बाजू मांडली आहे.

चेतन शर्मा काय म्हणाले होते? टी-20 या छोट्या फॉर्मेटमध्ये ऑलराऊंडर म्हणून नाही, तर फक्त फलंदाज म्हणून संघात माझी निवड झाली होती, असं हार्दिक पांड्याने सांगितलं. हार्दिकचं हे विधान निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांच्या वक्तव्याच्या बिलकुल उलट आहे. टी-20 वर्ल्डकपसाठी संघ निवडला गेला, त्यावेळी चेतन शर्मा यांनी हार्दिकची वर्ल्डकप संघात ऑलराऊंडर म्हणून निवड झाली आहे, तो त्याच्या कोट्यातील चार षटकं टाकणार असं म्हटलं होतं.

सर्व दोष माझ्यावर टाकला टी-20 वर्ल्डकपमधील टीम इंडियाच्या एक्झिटनंतर पराभवासाठी मला जबाबदार धरण्यात आलं, सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आला, असं मला वाटलं असं हार्दिक म्हणाला. बॅकस्टेज विथ बोरिया कार्यक्रमात हार्दिकने हा खुलासा केला. “वर्ल्डकपमध्ये संघाची जी अवस्था झाली, त्यानंतर मला असं वाटलं की, सगळ्याची जबाबदारी माझ्यावरच टाकण्यात आली. संघात एक फलंदाज म्हणून माझी निवड झाली होती. पहिल्या सामन्यात मी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. पण मला जमलं नाही”

भारताने आयसीसी टी20 वर्ल्डकपमध्ये खूपच खराब कामगिरी केली होती. साखळी फेरीतच संघाला गाशा गुंडाळावा लागला. पाकिस्तान विरुद्ध पहिल्याच सामन्यात मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानने भारतावर मात केली होती.

hardik pandya says he was picked as a batter in icc t20 world cup not as a all rounder chetan sharma said diffrent

राऊतांच्या पुस्तकावर विचारताच फडणवीस म्हणाले, माझं वय बालवाङ्मय...
राऊतांच्या पुस्तकावर विचारताच फडणवीस म्हणाले, माझं वय बालवाङ्मय....
ट्रम्पच्या हत्येच्या कट... ज्याच्यावर संशय तो म्हणतो कल्पनाच नव्हती की
ट्रम्पच्या हत्येच्या कट... ज्याच्यावर संशय तो म्हणतो कल्पनाच नव्हती की.
लालपरीच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, एसटी बस आता स्मार्ट होणार
लालपरीच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, एसटी बस आता स्मार्ट होणार.
ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शिरलं पाणी; रस्त्यांना आलं तलावाचं स्वरूप
ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शिरलं पाणी; रस्त्यांना आलं तलावाचं स्वरूप.
हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर, काय झाली चर्चा?
हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर, काय झाली चर्चा?.
नरकातला स्वर्ग नाही तर गटारातील... राऊतांवर चित्रा वाघ यांचा निशाणा
नरकातला स्वर्ग नाही तर गटारातील... राऊतांवर चित्रा वाघ यांचा निशाणा.
लष्करी सराव केला, क्षेपणास्त्र पुरवले; भारत-पाक तणावात चीनची भूमिका?
लष्करी सराव केला, क्षेपणास्त्र पुरवले; भारत-पाक तणावात चीनची भूमिका?.
'जेवढ्या वेळात लोकं नाश्ता करतात, तेवढ्याच वेळात पाकिस्तानला निपटवलं'
'जेवढ्या वेळात लोकं नाश्ता करतात, तेवढ्याच वेळात पाकिस्तानला निपटवलं'.
'रात के अंधेरे में उजाला..', 15 ब्रह्मोसचा मारा अन् पाकचं कंबरडं मोडलं
'रात के अंधेरे में उजाला..', 15 ब्रह्मोसचा मारा अन् पाकचं कंबरडं मोडलं.
पाकिस्तानची अक्कल ठिकाणावर आली! भारतासोबत शांतता चर्चेसाठी तयार
पाकिस्तानची अक्कल ठिकाणावर आली! भारतासोबत शांतता चर्चेसाठी तयार.