AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Aus : WTC Final मधील पराभवाला IPL कसं जबाबदार? सगळेच एक साधी, सोपी गोष्ट विसरतायत

Ind vs Aus WTC Final : पराभवानंतर कारणं शोधण्याची सवय कधी सुटणार? साध्या-सोप्या गोष्टी कोणी लक्षात घेत नाहीय. टीम इंडियाचा एक प्लेयर काही महिने इंग्लंडमध्येच होता. पण काय फायदा झाला?

Ind vs Aus : WTC Final मधील पराभवाला IPL कसं जबाबदार? सगळेच एक साधी, सोपी गोष्ट विसरतायत
ind vs aus wtc final 2023 Image Credit source: PTI
| Updated on: Jun 12, 2023 | 3:40 PM
Share

लंडन : टीम इंडियाचा एखाद्या मोठ्या स्पर्धेत किंवा महत्वाच्या मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर लगेच कारणांचा शोध घ्यायला सुरुवात होते. खोलात जाऊन विचार करण्यापेक्षा डोळ्यासमोर जे कारण असतं, ते पहिलं सांगितलं जातं. काल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. सलग दुसऱ्यांदा टीम इंडिया WTC फायनलमध्ये हरली. आधी न्यूझीलंड आणि आता ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. WTC फायनलच्या काही महिने आधी मायदेशात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत नमवलं होतं.

त्याआधी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन हरवलेलं. त्यांच्या घरात जाऊन कसोटी मालिका जिंकली होती. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाच पारड जड मानलं जातं होतं.

काय केलं, तर फक्त टॉस जिंकला

प्रत्यक्षात फायनल सामना सुरु झाल्यानंतर टॉस आणि पहिल्या दिवसाच पहिलं सत्र वगळता टीम इंडिया संपूर्ण मॅचमध्ये बॅकफूटवर होती. टीम इंडियाला एकही दिवस कसोटीवर वर्चस्व निर्माण करता आलं नाही. परिणामी टीम इंडियाचा 209 धावांनी दारुण पराभव झाला. आता या पराभवाच विश्लेषण करताना वेगवेगळी कारण शोधली जात आहेत.

फक्त IPL कशी जबाबदार?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पराभवासाठी IPL 2023 ला जबाबदार धरलं जातय. आयपीएलमुळे टीम इंडियाचा WTC फायनलमध्ये पराभव झाला, असं अनेक क्रिकेट विश्लेषकांच मत आहे. WTC मधील पराभवाला फक्त एकमेव IPL टुर्नामेंट कशी जबाबदार असू शकते?. टीम इंडियाचे खेळाडू फक्त दोन महिने आयपीएलमध्ये खेळतात. त्याआधी वर्षभर त्यांच वनडे, T20 आणि टेस्ट क्रिकेट सुरुच असतं.

वर्षभरात फक्त IPL मध्येच खेळलेत का?

टीम इंडियाचे खेळाडू वर्षभरात फक्त IPL खेळून, डायरेक्ट WTC ची फायनल खेळत नाहीयत ना? त्याआधी ते बरच T20, वनडे आणि टेस्ट क्रिकेट खेळलेत. महत्वाच म्हणजे या टीममध्ये कोणी नवखे खेळाडू नाहीयत. रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा आणि अजिंक्य रहाणे सारखे अनुभवी खेळाडू आहेत. त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर वनडे आणि टेस्ट क्रिकेट खेळण्याचा दीर्घ अनुभव मग आयपीएल कसं जबाबदार?

फिटनेसचा मुद्दा अयोग्य

फिटनेसचा विषय असेल, तर सगळे खेळाडू फिट होते, म्हणून त्यांची निवड केली होती. जसप्रीत बुमराह, केएल राहुल अनफिट असल्यामुळे त्यांची निवड झाली नव्हती. त्यामुळे फायनल हरण्याला फिटनेसचा मुद्दा सुद्धा लागू पडत नाही.

जेव्हा गरज होती, तेव्हा तो ढेपाळला

चेतेश्वर पुजारा तर आधीपासून इंग्लंडमध्ये होता. WTC फायनलच्या काही महिने आधीपासून चेतेश्वर पुजारा तिथे काऊंटी क्रिकेट खेळतोय. महत्वाच म्हणजे त्याने तिथे अनेक शतकं सुद्धा झळकवली आहेत. चेतेश्वर पुजाराच्या त्याच फॉर्मचे दाखले दिले जात होते. पण इंग्लंडमध्ये इतके महिने राहून चेतेश्वर पुजाराने काय केलं? जेव्हा गरज होती, तेव्हा तो ढेपाळला. मग पराभवाला फक्त आयपीएल कसं जबाबदार

WTC फायनलच्या पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 14 आणि दुसऱ्या डावात 27 रन्सवर बाद झाला. तो, तर आयपीएल खेळत नव्हता. इंग्लंडमध्ये इतके महिने राहून, तिथल्या वातावरणाशी जुळवून घेतल्यानंतरही तो फ्लॉप होतो. मग पराभवाला आयपीएल कसं जबाबदार?

बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.