AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG 2nd Test : बुमराह नाही तर हा खेळाडू होता ‘मॅन ऑफ द मॅच’चा मानकरी, टीम इंडियाचा पराभव होता अटळ

Man of The Match : टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह याला मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं. पण बुमराहपेक्षा एक असा खेळाडू तो जर खेळला नसता तर टीम इंडियाचा पराभव अटळ होता. कोण आहे तो जाणून घ्या.

IND vs ENG 2nd Test : बुमराह नाही तर हा खेळाडू होता 'मॅन ऑफ द मॅच'चा  मानकरी, टीम इंडियाचा पराभव होता अटळ
| Updated on: Feb 05, 2024 | 6:20 PM
Share

मुंबई : टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये इंग्लंड संघाचा पराभव केला आहे. दुसऱ्या सामन्यात जोरदार पुनरागमन करत इंग्लंडवर 106 धावांनी विजय मिळवलाय. पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये आता टीम इंडियाने या विजयासह 1-1 ने बरोबरी केली आहे. या सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने नऊ विकेट घेतल्या. या प्रदर्शनामुळे बुमराहला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं आहे. मात्र सामनावीर पुरस्काराचा आणखी एक खेळाडू मानकरी होता. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.

दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये संघात एक खेळाडू असा होता. ज्याच्या चमकदार प्रदर्शनामुळे टीम इंडियाने इंग्लंड संघाला आव्हान दिलं. नाहीतर टीमचा पराभव हा अटळ होता. हा खेळाडू नेमका कोण असा तुम्हाला प्रश्न पडला असेल? तर तो खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून जशस्वी जयस्वाल आहे पठ्ठ्याने पहिल्या डावात ठोकलेल्या द्विशतकामुळे टीम इंडियाने मोठं लक्ष्य इंग्लंडसंघासमोर ठेवलं. पहिल्या डावामध्ये तो सोडता इतर कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही.

यशस्वी जयस्वाल याने 290 बॉलमध्ये 209 धावा केल्या. यामध्ये त्याने 19 चौकार आणि सात षटकार मारले. या खेळीमुळे टीम इंडियाची धावसंख्या 400 पर्यंत पोहोचली होती. कारण दुसरा डाव पाहिला तर जेम्स अँडरसन याने यशस्वीला स्वस्तात माघारी पाठवलं होतं. दुसऱ्या डावात टीम इंडिया अवघ्या 255 धावांवर आऊट झाली होती.  सामना सांघिक कामगिरीने जिंकला असला तरी युवा खेळाडू असल्याने त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात यायला हवं होतं, असं नेटकरी बोलत आहेत.

दरम्यान, पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये टीम इंडियाने 1-1 ने बरोबरी साधली आहे. तिसरा कसोटी सामना राजकोट येथे पार पडणार आहे. हा सामना 15 फेब्रुवारीला होणार असून जो संघ हा सामना जिंकेल तो मालिकेत आघाडी घेणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.