AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

25 चौकार आणि षटकार..! वैभव सूर्यवंशी आणि टीम इंडियाचा कर्णधाराची जुगलबंदी, इंग्लंडमध्ये वादळ घोंघावणार

भारत आणि इंग्लंड यांच्यात अंडर 19 वनडे मालिका सुरु हगोणार आहे. या मालिकेतील पहिला सामना होवमध्ये होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी आक्रमक खेळी करण्यास सज्ज आहेत.

25 चौकार आणि षटकार..! वैभव सूर्यवंशी आणि टीम इंडियाचा कर्णधाराची जुगलबंदी, इंग्लंडमध्ये वादळ घोंघावणार
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेImage Credit source: PTI/ACC/X
| Updated on: Jun 26, 2025 | 2:59 PM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका होत आहे. अंडर 19 वनडे मालिका 27 जूनपासून सुरु होणार आहे. पहिला सामना होव मैदानात दुपारी 3.30 वाजता सुरु होणार आहे. मालिका सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. अंडर 19 वनडे संघाची धुरा आयुष म्हात्रेच्या खांद्यावर आहे. वनडे क्रिकेटमध्ये आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी हे खेळाडू ओपनिंगला उतरतात. या जोडीने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. या दोघांची आक्रमक खेळी पाहून इंग्लंडच्या अंडर 19 संघाचं टेन्शन वाढलं आहे. कारण या मालिकेपूर्वी आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी यांनी तीन सामन्यात ओपनिंग केली आहे. यावेळी या दोघांनी 81 चेंडूत 123 धावांची खेळी केली आहे. यात 25 चौकार आणि षटकार मारले आहेत. वैभव सूर्यवंशीने 5 षटकार आणि 8 चौकार मारले आहेत. तर आयुष म्हात्रेने 12 चौकार मारले आहेत. ही जोडी आता चौथ्यांदा वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच धरतीवर दोघांची खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. पहिल्यांदाच वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे ही जोडी आशियाबाहेर ओपनिंग करणार आहे. यापूर्वी खेळलेल्या तीन सामन्यात युएईमध्ये ही जोडी खेळली होती. यात बांग्लादेश, पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध ओपनिंग केली होती. म्हणजेच पहिल्यांदाच ही जोडी आशिया बाहेरील संघाविरुद्ध ओपनिंगला उतरणार आहे. आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. कारण ही जोडी किती आणि कशा धावा करते यावर पुढचं गणित ठरणार आहे. वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये शतक ठोकलं होतं. त्यामुळे त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा असणार आहेत. दुसरीकडे, इंग्लंडला कमी समजून चालणार नाही.

भारत आणि इंग्लंड अंडर 19 वनडे मालिकेतील पहिला सामना 27 जूनला, दुसरा सामना 30 जूनला, तिसरा सामना 2 जुलैला, चौथा सामना 5 जुलैला आणि शेवटचा सामना 7 जुलैला होणार आहे. त्यानंतर दोन कसोटी सामने खेळणार आहे. पहिला कसोटी सामना 12 जुलै ते 15 जुलै दरम्यान असेल. तर दुसरा कसोटी सामना 20 जुलै ते 23 जुलै दरम्यान असणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.