IND vs ZIM, KL Rahul : एकही धाव घेतली नाही, एकही झेल घेतला नाही, तरीही केएल राहुलला हा खास सामना लक्षात राहील, कारण जाणून घ्या…
IND vs ZIM, KL Rahul : यावर्षी जानेवारीत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जोहान्सबर्ग कसोटीत राहुलने प्रथमच कर्णधारपद भूषवले होते. त्यानंतर या दौऱ्यावर त्याने एकदिवसीय मालिकेतील तीनही सामन्यांचे नेतृत्व केले.
नवी दिल्ली : भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यातील एकदिवसीय मालिका सुरू झाली आहे. टीम इंडियाच्या (Team India) काही खेळाडूंसाठी ही मालिका खूप महत्त्वाची मानली जात आहे. ज्यामध्ये स्टार फलंदाज केएल राहुल (KL Rahul) देखील आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ दुखापतीशी झुंजणारा राहुल तब्बल तीन महिन्यांनंतर प्रथमच मैदानात उतरला आहे. एक फलंदाज म्हणून त्याच्यासाठी ही चांगली संधी आहे, पण त्याच्या कर्णधारपदावरही डोळे आहेत, ज्यात त्याचा विक्रम फारसा चांगला राहिला नाही. सुरुवातीच्या अपयशानंतर मात्र आता राहुलचे खाते उघडण्यात आले आहे. या दौऱ्यासाठी अखेरच्या क्षणी राहुलला जोडण्यात आले. त्याच्याआधी संघाची कमान शिखर धवनच्या हाती होती, मात्र फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर आशिया चषकापूर्वी या मालिकेत राहुलला टीम इंडियाचा भाग बनवण्यात आले. संघाचा नियमित उपकर्णधार असल्याने त्याच्याकडे कमान सोपवण्यात आली होती. अशा परिस्थितीत त्याच्याकडे आपला छोटा पण खराब कर्णधारपदाचा विक्रम सुधारण्याची चांगली संधी आहे.
राहुलने त्याची सुरुवातही केली आहे. टीम इंडियाने गुरुवारी 18 ऑगस्ट रोजी झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान झिम्बाब्वेचा 10 गडी राखून पराभव केला. भारताने प्रथम झिम्बाब्वेला केवळ 189 धावांत गुंडाळले. त्यानंतर शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी शतकी सलामीच्या भागीदारीच्या जोरावर सहज विजय मिळवला. अशाप्रकारे पाचव्या सामन्यात कर्णधार असताना राहुलला पहिला विजय मिळाला.
राहुलविषयी अधिक वाचा….
यावर्षी जानेवारीत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जोहान्सबर्ग कसोटीत राहुलने प्रथमच कर्णधारपद भूषवले होते. त्यानंतर या दौऱ्यावर त्याने एकदिवसीय मालिकेतील तीनही सामन्यांचे नेतृत्व केले. टीम इंडियाने हे सर्व सामने गमावले होते.
फलंदाजीची संधी नाही
मात्र, या सामन्यात राहुलला फलंदाजीची संधी मिळाली नाही. आशिया चषकापूर्वी फलंदाजीची लय मिळवण्यासाठी त्याने धवनसोबत ओपनिंगला जावे, जेणेकरून त्याला क्रीजवर अधिक वेळ घालवता येईल, असे मानले जात होते. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात राहुलला फलंदाजीची संधी मिळेल, अशी आशा राहुल आणि टीम इंडियाला असेल. मात्र, राहुल स्वत: कर्णधारपदाचा विक्रम सुधारण्यास प्राधान्य देईल, जरी त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.