AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : तिसऱ्या कसोटीत विराटचं अनोखं ‘अर्धशतक’, चाहत्यांसह स्वत: विराटही निराश

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी दरम्यान पहिल्या डावात भारतीय फलंदाज मिळून 100 धावाही करु शकले नाही. तर कर्णधार विराटने नको ते अर्धशतक नावे केले आहे.

IND vs ENG : तिसऱ्या कसोटीत विराटचं अनोखं 'अर्धशतक', चाहत्यांसह स्वत: विराटही निराश
विराट कोहली (भारतीय कर्णधार)
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 10:32 AM

IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) अजूनही हवी तशी कामगिरी करु शकलेला नाही. इंग्लंड मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात तो शतक तर दूर अर्धशतकही ठोकू शकलेला नाही. दरम्यान तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याच्याकडून एका चांगल्या खेळीची सर्वांनाच अपेक्षा असताना पहिल्या डावात तो केवळ 7 धावा करुन बाद झाला आहे. त्याच्यासह संपूर्ण भारतीय संघाचा (Team India) पहिला डाव केवळ 78 धावांवर आटोपला असून याचवेळी विराटच्या नावे नको ते अर्धशतक झाले आहे.

तर हे अर्धशतक म्हणजे विराट मागील 50 आंतरराष्ट्रीय डावांत एकही शतक ठोकू शकलेला नाही. नोव्हेंबर, 2019 मध्ये बांग्लादेश विरुद्ध डे-नाइट कसोटी सामन्यात शेवटचं शतक ठोकणाऱ्या विराटच्या बॅटमधून पुन्हा शतक कधी येईल? य़ाची सर्वच भारतीय आतुरतेने वाट पाहत आहेत. पण लीड्स येथील तिसऱ्या कसोटीतही विराटच्या हाती निराशाच आल्याने त्याने 50 आंतरराष्ट्रीय डाव हे शतक न ठोकता घालवले आहेत.

शतक तर दूर, अर्धशतकही ठोकणंही अवघड

कसोटी क्रिकेटमध्ये 27 शतकांसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 70 शतकं ठोकणाऱ्या कोहलीचा सध्या खराब टाईम सुरु आहे. मागील दोन वर्षात एकाही प्रकारात तो शतक ठोकू शकलेला नाही. याआधी तो सलग 25 डावांत शतक ठोकू शकला नव्हता. मात्र आता ही संख्या 50 झाली आहे. शतकच नाही तर कोहलीला अर्धशतक ठोकणंही अवघड झालं आहे. कारण 2020 पासून आतापर्यंत तो केवळ 3 कसोटी अर्धशतकं ठोकू शकला आहे. इंग्लंडच्या या दौऱ्यात तो आतापर्यंत WTC पकडून तो 7 डाव खेळला आहे. ज्यामध्ये एकही अर्धशतक आलेले नाही. आता लीड्समधील दुसऱ्या डावाततरी तो हा दुष्काळ संपवतो का? हे पाहावे लागेल.

हे ही वाचा

IND vs ENG : भारतीय संघाच्या पाठी लागला ‘हा’ इंग्रज, तिसऱ्या कसोटीत पराभव निश्चित? ‘हे’ आहे कारण

IND vs ENG : जो रुट आणि विराट कोहलीमध्ये मैदानाबाहेरही झाला होता वाद, समोर आली खळबळजनक माहिती

(India is in danger position at third test and virat kohli did not scored century in last 50 international cricket innings)

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.