Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG 2nd ODI: दुसऱ्या वनडेतील दारुण पराभवानंतर रोहित शर्माने कोणाला दिला दोष? काय म्हणाला?

IND vs ENG 2nd ODI: लॉर्ड्स (Lords) मधील दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा इंग्लंडकडून (IND vs ENG) दारुण पराभव झाला. इंग्लंडने मोठ्या अंतराने तब्बल 100 धावांनी भारतीय संघाला पराभूत केलं.

IND vs ENG 2nd ODI: दुसऱ्या वनडेतील दारुण पराभवानंतर रोहित शर्माने कोणाला दिला दोष? काय म्हणाला?
rohit-sharma
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 9:33 AM

मुंबई: लॉर्ड्स (Lords) मधील दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा इंग्लंडकडून (IND vs ENG) दारुण पराभव झाला. इंग्लंडने मोठ्या अंतराने तब्बल 100 धावांनी भारतीय संघाला पराभूत केलं. या विजयासह इंग्लंडने मालिकेत कमबॅक केलं. भारताने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली होती. पण आता इंग्लंडच्या संघाने मालिकेत बरोबरी साधलीय. आता रविवारी होणाऱ्या तिसऱ्या सामन्यातून मालिकेचा निकाल लागेल. पराभवानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) संघातील खेळाडूंची शाळा घेतली. त्याने टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करण्यास सांगितलं. स्वत: रोहित शर्मा या सामन्यात खातही उघडू शकला नाही. टॉस जिंकल्यानंतर रोहितने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यांनी इंग्लंडला 246 धावांवर रोखलं. पण त्याच विकेटवर भारतीय फलंदाज अपयशी ठरले.

रोहित काय म्हणाला?

“आम्ही चांगली गोलंदाजी केली. पण तुम्हाला सामना जिंकायचा असेल, तर झेल घेणं आवश्यक आहे”, असं रोहित म्हणाला. 40 व्या षटकात शमीच्या चौथ्या चेंडूवर हार्दिक पंड्याने मिड ऑनवर विलीचा झेल सोडला. विली त्यावेळी 24 धावांवर खेळत होता. त्याने 41 धावा केल्या. “आम्ही चांगली गोलंदाजी केली. पण चांगली फलंदाजी करु शकलो नाही. आमच्याकडे फलंदाजांची मोठी फळी आहे. पण टॉप ऑर्डरने चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे. असं झालं असतं, तर आम्ही आज पुढे असतो” असं रोहित म्हणाला.

पीच बद्दल रोहितचं काय चुकलं?

“खेळपट्टी नंतर फलंदाजीसाठी अनुकूल होत जाईल, असं वाटलं होतं. पण सुरुवातीपासूनच या पीच मध्ये गोलंदाजांसाठी काहीतरी होतं” असं रोहित म्हणाला. इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताची टॉप ऑर्डर कोसळली. रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली आणि ऋषभ पंत फ्लॉप ठरले. रोहित 10 चेंडू खेळला पण खातही उघडू शकला नाही. शिखर धवनने 26 चेंडूत 9 धावा केल्या. कोहलीने 25 चेंडूत 16 धावा. पंत 5 चेंडू खेळून शुन्यावर आऊट झाला. भारतासाठी हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजाने सर्वाधिक 29, 29 धावा केल्या.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.