AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA 5th T20 Weather Report: आज पाऊस ‘फायनल’चा खेळ बिघडवणार? जाणून घ्या टॉसच्या वेळी कसं असेल बंगळुरुतील हवामान

IND vs SA 5th T20 Weather Report: आजचा सामना जिंकून मालिका विजय मिळवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. सगळ्यांच्या नजरा फायनल मॅचकडे लागल्या आहेत. मात्र आजच्या सामन्यातमान हवामान सुद्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

IND vs SA 5th T20 Weather Report: आज पाऊस 'फायनल'चा खेळ बिघडवणार? जाणून घ्या टॉसच्या वेळी कसं असेल बंगळुरुतील हवामान
IND vs SAImage Credit source: PTI
| Updated on: Jun 19, 2022 | 1:25 PM
Share

मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिकेत (IND vs SA) रविवारी बेंगळुरुत सीरीजमधील पाचवा टी 20 सामना खेळला जाणार आहे. मालिकेतील हा अंतिम सामना आहे. दोन्ही टीम्स हा सामना जिंकण्यासाठी आपली ताकत पणाला लावतील. कारण सध्या मालिका 2-2 अशी बरोबरीत आहे. दक्षिण आफ्रिकेने (South Africa) पहिले दोन सामने जिंकले, तर भारताने पिछाडीवरुन कमबॅक करत मालिकेत बरोबरी साधली. आजचा सामना जिंकून मालिका विजय मिळवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. सगळ्यांच्या नजरा फायनल मॅचकडे लागल्या आहेत. मात्र आजच्या सामन्यातमान हवामान सुद्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे चाहत्यांचे लक्ष खेळाबरोबर हवामानाकडेही (Weather) असेल. टीम इंडियाने पिछाडीवरुन ज्या पद्धतीन कमबॅक केलय, त्यामुळे आजच्या सामन्याबद्दल प्रचंड उत्सुक्ता आहे. भारतीय संघाला मालिका विजयाची संधी आहे. पण आजच्या सामन्यात पाऊस व्यत्यय आणू शकतो. या सामन्यात पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. संपूर्ण दिवसभर आकाशात ढग असतील.

टॉसच्यावेळी वातावरण बिघडण्याचा अंदाज

आज संध्याकाळी 7 वाजता सामना सुरु होईल. यावेळी हवामान आणखी बिघडण्याची शक्यता आहे. एक्यवेदरनुसार, बंगळुरुमध्ये रविवारी संध्याकाळी 7 वाजता पाऊस कोसळण्याची शक्यता 51 टक्के आहे. त्यामुळे सामना उशिराने सुरु होऊ शकतो. त्यानंतरही आकाश निरभ्र होण्याची शक्यता कमी आहे. 8 वाजता 47 टक्के आणि त्यानंतर 35 टक्के पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.

बंगळुरुच्या स्टेडियमचा रेकॉर्ड काय?

बंगळुरुच्या ज्या स्टेडियमवर मॅच होणार आहे, तिथे आतापर्यत 8 इंटरनॅशनल सामने झाले आहेत. त्यावेळी 5 वेळा लक्ष्याचा पाठलाग करताना टीम जिंकली आहे. 3 वेळा प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. प्रथम फलंदाजी करताना या पीचवर सरासरी धावसंख्या 153 आहे. मागचा चौथा टी 20 सामना भारताने जिंकला. या मॅचमध्ये दिनेश कार्तिक आणि आवेश खानने जबरदस्त प्रदर्शन केलं होतं. कार्तिकने 55 धावा फटकावल्या. आवेश खानने चार विकेट घेतल्या. भारताने 82 धावांच्या मोठ्या फरकाने चौथा सामना जिंकला होता.

3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.