AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs DC : अक्षरने दिल्लीच्या पराभवासाठी कोणाला धरलं दोषी? तर गिलने विजयाचं श्रेय दिलं या खेळाडूंना

आयपीएल 2025 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगला. हा सामना कधी या पारड्यात तर कधी त्या पारड्यात झुकलेला होता. पण शेवटी गुजरात टायटन्स सरस ठरला आणि 7 विकेट्सने विजय मिळवला.

GT vs DC : अक्षरने दिल्लीच्या पराभवासाठी कोणाला धरलं दोषी? तर गिलने विजयाचं श्रेय दिलं या खेळाडूंना
शुबमन गिल आणि अक्षर पटेलImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 19, 2025 | 9:28 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात गुजरात टायटन्सने पहिल्यांदाच 200 पार धावांचा पाठलाग यशस्वीरित्या केला आहे. यापूर्वी गुजरात टायटन्सने आरसीबीविरुद्द 198 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला होता. विशेष म्हणजे गुजरात टायटन्सने मोठ्या धावांचा पाठलाग करताना शेवटच्या षटकातच टार्गेट गाठलं आहे. दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं होतं.हे आव्हान गुजरात टायटन्सने 3 गडी गमवून 19.2 षटकात पूर्ण केलं. खरं तर एक क्षण असा होता की सामना दिल्ली कॅपिटल्सच्या पारड्यात झुकलेला होता. पण जोस बटलरने सामना खेचून आणला. या सामन्यानंतर पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने आपलं मत मांडलं आहे. अक्षर पटेल म्हणाला की, ‘आम्हाला 10-15 धावा कमी पडल्या. आम्ही वेग वाढवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही विकेट गमावत राहिलो. आम्हाला हव्या त्या पद्धतीने खेळ संपवता आला नाही. आम्ही चांगली गोलंदाजी केली. जर आम्ही आणखी काही संधी निर्माण केल्या असत्या तर परिस्थिती जवळ आली असती. ही काही फटक्यांची बाब होती. या पराभवाबद्दल आम्ही जास्त विचार करणार नाही.’

विजयानंतर शुबमन गिलनेही आपलं मत मांडत म्हणाला की, ‘एकेकाळी असे वाटत होते की एकूण धावसंख्या 220-230 होईल. आम्ही ज्या पद्धतीने त्यांना खाली खेचलं त्याचे श्रेय गोलंदाजांना जाते. पहिल्या सामन्यातही 245 धावांचा पाठलाग करताना आम्ही खेळात बरोबर होतो, फक्त 10 धावांनी हरलो. आम्ही चांगला पाठलाग करत आहोत, आम्ही चांगला बचाव करत आहोत.’

‘अक्षरच्या फलंदाजीमुळे ते सामन्यात पुढे होते. वेगवान गोलंदाजांना फटका मारणे कठीण होते, म्हणून आम्हाला वाटले की आम्ही त्यांच्यासोबत खेळत राहू. रन आऊट होणं होण्याची निराशाजनक असतं. परंतु आमच्याकडे येथे बरेच सामने आहेत आणि आशा आहे की मला संधी मिळेल. बटलर आणि रदरफोर्डने ज्या पद्धतीने स्ट्राइक रोटेट केले आणि त्यांनी मारलेले फटके जबरदस्त होते. त्यांनी खूप विचारपूर्वक फलंदाजी होती, ती पाहणे एक आनंदाची गोष्ट होती. हा विजय मिळवून खूप आनंद झाला.’, असं शुबमन गिल पुढे म्हणाला.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.